AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाच्या बैठकीत राडा का झाला? मनोज जरांगे पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया

मराठा समाजाच्या बैठकीत आज राडा झाला. या राड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीत तुफान राडा झाला. अखेर या प्रकरणात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

मराठा समाजाच्या बैठकीत राडा का झाला? मनोज जरांगे पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया
मराठा नेते मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 9:09 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार राडा झाला. लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळेला एका व्यक्तीने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याने वाद सुरु झाला. त्याचवेळी संतप्त झालेल्या जमावाने विकी पाटील या तरुणाला मारहाण केली. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या राड्यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मराठा नेते मनोज जरांगेंच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं. 60 ते 70 जणांच्या उपस्थितीत बैठक शांततेत सुरू होती. मात्र अचानक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. काही कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर बाळू औताडे या तरूणाकडून विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.

मारहाणीनंतर बैठक उधळली आणि पुढे बराच वेळ राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. बैठकीत राडा झाल्यानं उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली. राड्यानंतर महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बैठकीत चंद्रकांत खैरेंची सुपारी घेऊन काही कार्यकर्ते आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या सर्व प्रकाराबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं खैरेंनी म्हटलंय.

मराठा समाज मोठा असल्यामुळे भांड्याला भांड लागतं. मात्र, ज्या दोघांमध्ये वाद झाला त्यांना बोलावून वाद मिटवू असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. तर काही लोक बैठकीत आपआपल्या पक्षाचा रेटा लावत असल्यानं वाद झाल्याचं मराठा समन्वयक विनोद पाटलांनी म्हटलंय.

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

“भांड्याला भांडं लागतच असतं. त्यावर लगेच भूमिका घ्यायची गरज नाही. पण आम्ही दोघी बांधवांना बोलवून घेऊ. त्यांचा काय विषय आहे ते समजून घेऊ. दोघांना बोलवून घेऊ. मार्ग निघणार. समाज एकत्र आहे. समाज तुम्हाला एकत्रित दिसणार आणि एकत्र राहणार. आपले मते जर ग्राह्य धरली जात नसले, आपली किंमत केली जात नसली, तर आपल्याला एका टोकाच्या भूमीवर यावं लागतं. नाही जिंकत ना आम्ही, तर आम्ही तुमचे पाडू शकतो ही शक्ती मराठे यावेळेस दाखवणार आहेत. मग त्यांना कळेल की, आपण हा नसता जाळ अंगावर घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दिली आहे.

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....