मनोज जरांगेचा प्रस्ताव आला तर… ओवैसी यांचं सूचक विधान; महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार?

Asaduddin Owaisi on Manoj Jarange Patil : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. ओवैसी यांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण आलंय. वाचा सविस्तर...

मनोज जरांगेचा प्रस्ताव आला तर... ओवैसी यांचं सूचक विधान; महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार?
असदुद्दीन ओवैसी, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 8:00 PM

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली. मनोज जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला. तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेल. बीडमधून जरांगे यांच्या मुळे पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे. मग मुस्लिम का जिंकत नाही.. महाराष्ट्र 11 टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. ओवैसी -जरांगेंमध्ये सकारात्मक चर्चा झाली, मराठा समाज आणि मुस्लीम समाज एकत्र आला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगेंबाबत काय म्हणाले?

मी मनोज जरांगे पाटील यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो… जरांगेंमुळे 8 खासदार निवडून आले… पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात. पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाहीत. इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रमधील मुस्लिम समाजात राग आहे. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचा दुःख आहे. मुस्लिम सर्वांना मतदान केलं. मग आम्हाला का मतदान करत नाही. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे, असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

ओवैसींचा इशारा काय?

मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहे. मोदी म्हणतात मी बँकवर्डचा नेता आहे. मग आरक्षणाच्या टक्क्यांचं बिल आणा. महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार निवडून दिला नाही. आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं आहे. आम्ही सर्वांना मत दिली. पण आमचा उमेदवार पाडला. आम्हाला बहुमत मिळालं. पण प्रत्येक ठिकाणी गद्दार राहतात. त्यांना वाटत आपला माणूस जिंकला नको पाहिजे. गद्दार यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असा इशाराही ओवैसींनी दिला आहे.

बुलडोझर फक्त मुस्लिम लोकांच्या घरावर चालतात, निशाण्यावर फक्त आम्ही आहोत. आम्हीच फक्त भाजपचा विरोध करत आहे. त्यांना विचारा भीमा कोरेगावत जीव गेले. उद्या विरोध करण्याचा मुद्दा आल्यास भाजपला आम्ही विरोध करणार आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत एक मर्द जलील उभा होते. त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही जिंकण्यासाठी लढतो, कुणाला पाडण्यासाठी लढत नाही. इम्तियाज जलील यांची कमतरता लोकसभेत जाणवते. पण प्रश्न असा आहे की नुकसान कुणाचं होत आहे?, असं ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.