AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लोकांना आवडते म्हणून बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला”; ठाकरे-फडणवीस वादावर या नेत्याची सडकून टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांवरील व्यक्तीगत टीका केल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांना सुनावले आहे.

लोकांना आवडते म्हणून बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर या नेत्याची सडकून टीका
| Edited By: | Updated on: Apr 05, 2023 | 9:59 PM
Share

सांगली : देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर आता भाजपप्रमाणेच विरोधकही आता आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याव फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यावरून आता राजकारण तापलेले असतानाच माजी खासदार संभाजीराजे यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवरून माजी खासदार संभाजीराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले आहे. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा राज्याच्या विकासावर चर्चा करणे, त्यासाठी विकासात्मक राजकारण करणे गरजेचे असल्याचे मत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

संभाजीराजे यांनी बोलताना सांगितलेकी, राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे व्यक्ती दोष ठेऊन राज्याचे राजकारण ज्या प्रमाणे सत्ताधाऱ्यांनी करू नये त्याच प्रमाणे विरोधकांनीही करू नये असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संभाजीराजे यांनी राजकारण्यांना सुनावत असताना त्यांनी व्यक्ती दोष ठेवून राजकारण केले जाऊ नये अशी सत्ताधारी आणि विरोधकांनी विनंती केली आहे.छोट्या छोट्या गोष्टीवरून राजकारण करून राज्याचा विकासाला खीळ बसता कामा नये अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विकासात कोणी चुकत असेल तर नक्की बोलावे, मात्र व्यक्ती दोष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सध्या राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणामुळे विकासाच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊन राज्याचा विकासाला हे बाधक असल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर विकासावर राजकारण्यांनी आता विकासावरच बोललं पाहिजे. कारण आपल्याला राज्याचा विकास साधायचा आहे.

सत्तेत असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनीही व्यक्ती सोडून बोलणं गरजेचं आहे. लोकांना आवडते म्हणून बोलण्यापेक्षा, महाराष्ट्र किती अडचणीतून चालला आहे. त्याला नवी दिशा कशी देता येईल यावर बोलणे झाले पाहिजे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांवरील व्यक्तीगत टीका केल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांना सुनावले आहे. आज सांगलीमध्ये मराठा प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.