AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांना खोके, ‘यांना’ पेट्या तर द्या… चंद्रकांत खैरेंचं म्हणणं काय?

आजपासून दिवाळी सुरु झाली आहे आणि शेतकऱ्यांना काहीच नाही? ही चुकीची गोष्ट असल्याचं खैरे म्हणाले.

आमदारांना खोके, 'यांना' पेट्या तर द्या... चंद्रकांत खैरेंचं म्हणणं काय?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 22, 2022 | 1:28 PM
Share

औरंगाबादः दिवाळी (Diwali) तोंडावर असतानाच महाराष्ट्रात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. मात्र राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावर सडकून टीका केली आहे. दिवाळीत अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतीचं नुकसान झालंय. सोयाबीन गेलं.. काहीच नाही राहिलं… हे सरकार काय करतं माहिती नाही. आमचे इथले एक शेती मंत्री आहेत. ते म्हणाले, आणेवारी नाही काढायची, ओला दुष्काळ जाहीर करायचा नाही… जसं की यांच्या खिशातून पैसे चाललेत का, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.

या लोकांना आमदारांना खोके देता, शेतकऱ्यांना पेट्या तर द्या. हे नाहीच होते… आजपासून दिवाळी सुरु झाली आहे आणि शेतकऱ्यांना काहीच नाही? ही चुकीची गोष्ट असल्याचं खैरे म्हणाले.

पाहा चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी काल मनसेच्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे राज ठाकरे शिंदे-फडणवीसांसोबत आगामी निवडणुकांत लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रकांत खैरे यांनी या विषयावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एवढे मजबूत आहेत की, त्यांना याची काहीही पर्वा नाही. बाळासाहेब ठाकरे आणि जनतेचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांना आहे. या तिघांचं रोज काहीतरी चालंलंय. पण तेही ठाकरेच आहेत. हे दोघं त्यांना कितपत मदत करतील…. या दोघांना लहर आली की ते काहीपण करतील, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.

तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भीतीमुळे, दहशतीमुळेच हे तिघे महायुतीत एकत्र आले आहेत, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलंय.

एकूणत शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांची समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.