Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारसू रिफायनरी प्रकरणात नितेश राणे यांची उडी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले ?

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

बारसू रिफायनरी प्रकरणात नितेश राणे यांची उडी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 4:17 PM

सिंधुदुर्ग : राज्यात सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुण राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट जालियनवाला बाग हत्याकांड होईल अशी शंका उपस्थित करत हल्लाबोल केला आहे. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याबाबत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, स्थानिकांच्या अडचणी दूर करून हा प्रकल्प व्हावा असे मत मांडले होते. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्राचा दाखला देत दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा दावा केला होता. याच दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनीही याबाबत भाष्य केले आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची ही सवयच आहे, उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या ज्या ज्या प्रकल्पांना पहिला विरोध केला, काही काळानंतर तेच त्यांच्या समर्थनासाठी उतरले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या विरोधाची किंमत ज्यादिवशी मोजली जाईल त्या दिवशी त्यांचे समर्थन मिळेल. उद्धव ठाकरेंना आपली किंमत वाढवायची असून चेकवरचे आकडे वाढवायचे आहेत त्यासाठी त्यांचे राज्यपालांना वगैरे भेटणार हे चाललंय आहे असा नितेश राणे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांचा आकडा वाढेल त्या दिवशी त्यांचा बारसु रिफायनरीला विरोध कमी होईल. मातोश्री एकचे दोन झाले आहेत, खर्च वाढलेला आहे. मुलांची लग्ने करायची आहेत म्हणून हे विरोध करायला लागतात अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

रत्नागिरी येथील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये काही महिलांनी विरोध दर्शविला आहे. त्यात काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावरून सरकारवर दडपशाहीचा आरोप केला जात आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उदय सामंत यांनी सरकार कुणावर दडपशाही करणार नाही. उद्धव ठाकरे यांनीच या प्रकल्पाची मागणी केली होती. तोच प्रकल्प आम्ही करत असून राजकीय षड्यंत्र उभं केले जात असल्याचा आरोपही उदय सामंत यांनी केला आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.