AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Kidnapping : पळून जाऊन लग्न केल्याने तरुणाचे अपहरण, टेभुर्णी पोलिसांकडून तरुणांची सुटका, 8 जण ताब्यात

राजस्थान येथील रामनिवास याने संशयित आरोपीच्या नात्यातील एका मुलीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघेही हैद्राबाद येथे वास्तव्यास होते. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी हैद्राबाद येथे जाऊन मुलीशी लग्न केलेल्या त्या तरुणाचे हैद्राबादमधून अपहरण केले होते. याप्रकरणी तेलंगणा राज्यातील वनस्थळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

Solapur Kidnapping : पळून जाऊन लग्न केल्याने तरुणाचे अपहरण, टेभुर्णी पोलिसांकडून तरुणांची सुटका, 8 जण ताब्यात
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 4:07 PM

सोलापूर : मुलीने पळून जाऊन लग्न केले म्हणून मुलीच्या घरच्यांनी मुलाचे अपहरण (Kidnapping) केल्याची घटना उघडकीस आली आहे. टेभुर्णी पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी अपहृत तरुणाची सुटका (Rescue) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तरुणाची सुटका करुन त्याला हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुलीच्या घरच्यांनी पीडित तरुणाचे हैदराबाद येथून अपहरण केले होते. (Abduction and release of a young man from the girl’s relatives for marrying against the wishes of the family)

अपहरण करणाऱ्या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश

राजस्थान येथील तरुणाने पळून जाऊन लग्न केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी हैद्राबाद येथून एका तरुणाचे अपहरण केले होते. त्याला पुणे येथून घेऊन निघाले होते. टेभुर्णी पोलिस व महामार्ग पोलिसांच्या मदतीने अपहरणकर्त्यांना ताब्यात घेऊन त्या तरुणाची सुटका करण्यात आली. त्यास हैद्राबाद पोलिसांकडे स्वाधिन केले आहे. 26 फेब्रुवारी रोजी सोलापूर पुणे महामार्गावरील माढा तालुक्यातील वरवडे टोलनाक्यावर ही घटना उघडकीस आली. अपहरण केलेल्या 8 जणांवर टेभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका महिलेसह सात जणांचा समावेश असून या 8 जणांना 26 च्या रात्री उशिरा हैद्राबाद पोलिसांनी टेभुर्णीत येऊन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पीडित तरुणाने आरोपींच्या नात्यातील मुलीशी पळून विवाह केला होता

राजस्थान येथील रामनिवास याने संशयित आरोपीच्या नात्यातील एका मुलीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघेही हैद्राबाद येथे वास्तव्यास होते. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी हैद्राबाद येथे जाऊन मुलीशी लग्न केलेल्या त्या तरुणाचे हैद्राबादमधून अपहरण केले होते. याप्रकरणी तेलंगणा राज्यातील वनस्थळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हैद्राबादवरुन पुण्याकडे जात असताना वरवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करुन टेभुर्णी पोलिस व महामार्ग पोलिसांनी आरोपींना अटक करुन त्या प्रेम विवाह केलेल्या तरुणाची सुटका केलीय. (Abduction and release of a young man from the girl’s relatives for marrying against the wishes of the family)

इतर बातम्या

AP Youth Death : युट्युब पाहून दोन विद्यार्थ्यांनी केला लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेचा प्रयत्न; तरुणाचा दुदैवी मृत्यू

Kanjurmarg Fire : कांजुरमार्ग येथे इमारतीला आग, अग्नीशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.