AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahajibapu Patil : मोठी बातमी, शहाजी बापू पाटील यांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा, गावकऱ्यांसमोर थेटच बोलले

Shahajibapu Patil : काय झाडी काय डोंगर अशा विधानापासून ते विजयी झालो नाहीतर थेट फास घेण्याची भाषा करणाऱ्या शहाजीबापूंनी आता अजून एक बॉम्ब टाकला आहे. त्यांनी भरसभेत राजकीय संन्यासाची भाषा केली आहे. त्यांच्या या नवीन पवित्र्याची सांगोला तालुक्यात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Shahajibapu Patil : मोठी बातमी, शहाजी बापू पाटील यांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा, गावकऱ्यांसमोर थेटच बोलले
आता थेट राजकीय संन्यासाची भाषा
| Updated on: Nov 28, 2024 | 10:51 AM
Share

विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात भरभरून मतदान झाले. महायुतीची त्सुनामी आली. भाजपासोबत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा मोठं यश खेचून आणलं. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक जण गेले होते. त्यात सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे सुद्धा होते. त्यांचं गुवाहाटीतील काय झाडी, काय डोंगर, हे विधान गाजलं होतं. या निवडणुकीत जिंकलो नाही तर फास घेईल असं अतितायीपणाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. हा गड शेतकरी-कामगार पक्षानं पुन्हा ताब्यात घेतला बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले आणि पाटलांना धक्का बसला. आता त्यांनी भरसभेत राजकीय संन्यासाची भाषा केली आहे.

नाहीतर मी संन्यास घेणार

माजी आमदार शहाजी बापू पाटील हे पराभवानंतर पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूर परिसरात या पराभवाचे चिंतन आणि मंथन करण्यात येत आहे. यावेळी एका ठिकाणी जनतेशी संवाद साधताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आश्वासन दिले.

निवडणूकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. पराभव झाल्यानंतर सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

आता वरिष्ठांकडून पद घेऊनच येणार

ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती, असे ते म्हणाले. दोन वर्षात ५ हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले. सूडाचे राजकारण मी केले नाही करत नाही…शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो, असे ते म्हणाले. यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याची चर्चा होत आहे. पुढील स्थानिक स्वराज संस्थेत गुलाल घेऊनच येणार, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.