AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात प्रशासनाकडून मनाई आदेश, ‘या’ 7 गोष्टी पाळणं बंधनकारक

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहरात पोलीस विभागाने मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 1 मार्च रोजी मध्यरात्रीपासून 15 मार्चपर्यंत अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आलेत.

ठाण्यात प्रशासनाकडून मनाई आदेश, 'या' 7 गोष्टी पाळणं बंधनकारक
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने मुलुंड परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.
| Updated on: Feb 26, 2021 | 9:09 PM
Share

ठाणे : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहरात पोलीस विभागाने मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 1 मार्च रोजी मध्यरात्रीपासून 15 मार्चपर्यंत अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आलेत. मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे आदेश दिले (Thane Police restrict many things to keep law and order in city).

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय सध्या काही आंदोलनं सुरूही आहेत. 11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री, छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, 12 मार्च रोजी शब-ए-मेराज असे सण उत्सव संपन्न होणार आहे. या काळात सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी खबरदारी म्हणून हे आदेश देण्यात आलेत.

मनाई आदेशात कशावर निर्बंध?

1. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई.

2. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई.

3. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेण्यास मनाई.

4. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविण्यास मनाई.

5. कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करण्यास मनाई.

6. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करण्यास मनाई.

7. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देणे इ. कृत्यांना मनाई.

‘या’ व्यक्तींना मनाई आदेश लागू राहणार नाही

सरकारी नोकर किंवा वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावण्यासाठी शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांना या मनाईतून सूट देण्यात आलीय. लग्न कार्यासाठी जमलेले लो, प्रेत यात्रा आणि अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/ निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त आणि त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणांना यातून सूट देण्यात आलीय.

हेही वाचा :

तलवारी नाचवणाऱ्या तरुणांसाठी पोलिसांची गांधीगिरी, मुलं वाममार्गाला लागू नये म्हणून अनोखी शक्कल

ठाणे TMT जाहिरात घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कोरोना नियमांची ऐसी तैसी, ठाण्यात रात्री उशिरापर्यंत छमछम, लेडीजबारसह पाच बार सील; महापालिकेची कारवाई

व्हिडीओ पाहा :

Thane Police restrict many things to keep law and order in city

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.