Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन महिन्यांत दीड कोटींची वीजचोरी, महावितरणच्या कारवाईनंतर शहर हादरलं

पथकाकडून झालेल्या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास, तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आली.

दोन महिन्यांत दीड कोटींची वीजचोरी, महावितरणच्या कारवाईनंतर शहर हादरलं
MAHAVITRAN Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 2:55 PM

कल्याण : उच्चदाब ग्राहकांच्या (Kalyan news) वीजपुरवठ्याच्या तपासणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महावितरणच्या कल्याण मंडळ कार्यालय (kalyan mahavitran) एकच्या विशेष पथकाने गेल्या दोन महिन्यांत तब्बल १ कोटी ४३ लाख रुपयांच्या ३८ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यातील २९ उच्चदाब ग्राहकांकडून वीजचोरीच्या देयकांचे १ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोंघाविरुद्ध पोलिसांत (police) गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून जाहीर करण्यात आली आहे.

महावितरणच्या कल्याण मंडळ कार्यालया अंतर्गत उच्चदाब थ्री फेज ग्राहकांची वीज चोरी रोखण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. कल्याण दोन, वसई आणि पालघर या मंडळ कार्यालयांतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या तपासणीसाठी नियमित कर्मचाऱ्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. कल्याण मंडळ कार्यालय एकच्या विशेष पथकाने उमेशनगर, हाजीमलंग, गौरीपाडा, नेतीवली, खंबालपाडा, सोनारपाडा, सागाव, रेतीबंदर, पारनाका आदी भागात वीजवापराच्या माहितीचे विश्लेषण आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासणी करण्यात आली, त्यामध्ये अनेकांनी वीज चोरी केल्याचं आढळून आलं आहे.

पथकाकडून झालेल्या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास, तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आली. यातील २९ जणांकडून वीजचोरीच्या देयकाचे १ कोटी १७ लाख रुपये. याशिवाय १२ जणांकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल ही केला आहे. तर या प्रकरणी दोंघाविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला असून यापुढेही विशेष पथकांच्या कारवाया नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

वीज चोरीची प्रकरण अधिक वाढली आहेत. त्यामुळे काही महिन्यांनी तपासणीसाठी पथक तयार करण्यात येतं. पथकाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे, त्याचबरोबर दंड सुध्दा वसूल केला आहे. त्यामुळे सध्या चोरीचं प्रमाण कमी झालं आहे. परंतु चोरीच प्रमाण अजून कमी व्हावं यासाठी पथकाची निर्मिती केली जाते. जे ग्राहक अरेरावी करीत आहेत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.