AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवली,अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी परिसरात दोन महिने टँकर बंदी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

औद्योगिक क्षेत्रामध्ये रविवारी १४ मे पासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टँकर बंदी करण्यात आली आहे.

डोंबिवली,अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी परिसरात दोन महिने टँकर बंदी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
truckImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 15, 2023 | 8:50 AM
Share

ठाणे : ठाणे (thane) जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर (badlapur) औद्योगिक क्षेत्रामध्ये रविवारी १४ मेपासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (shrikant propkari) यांनी दिली आहे. अनेकदा धोकादायक पद्धतीचं केमीकल नदीच्या पाण्यात सोडलं जात असल्यामुळं टँकरला बंदी घालण्यात आली आहे. नदीच्या पाण्यात आत्तापर्यंत अनेकदा केमिकल (chemical) सोडण्यात आल्यामुळे लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.

KALYAN TANKER BANDI

नदी

संध्याकाळपासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. यावर आळा घालण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस व वाहतूक पोलिसांकडून औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला संध्याकाळपासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी सांगितले.

केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते

औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते असल्याने पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होत असल्याने निर्णय घेतला आहे. अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली.

नदीच्या पाण्यात यापुर्वी अनेकदा टँकरमधील केमिकल सोडण्यात आलं आहे, त्यामुळे लोकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.