AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल […]

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 2:24 PM
Share

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल आज सकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पूल धोकादायक झाला असल्याने ग्रामस्थांनी नव्याने बांधण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीनुसार पुलाच्या डागडुजीसाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र डागडुजीला सुरुवात झाली नसल्याने पुलाचा काही भाग आज खचला आहे. या पुलावर मोठा खड्डा पडल्याने या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली असून पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पुलावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या पूलाचे कठडे कोसळण्याची घटना घडली होता. यावर्षी पूलाचा काही भागच खचला असून पूलाला भगदाड पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पूलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला असून तो पावसात कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मलंगगड परिसरात असलेल्या चिरड, शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक झाला आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.