AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, नाना पटोलेंचा इशारा; भाजपच्या एकमेव धर्माचाही उद्धार…!

नाना पटोले म्हणाले की, वाचाळ बोलणे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपला आता सत्तेचा रोग झाला आहे.

मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, नाना पटोलेंचा इशारा; भाजपच्या एकमेव धर्माचाही उद्धार...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नाना पटोले
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 1:58 PM
Share

मुंबईः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्राला कोरोना सुपरस्प्रेडर संबोधले. हे लांच्छन जनता कदापि सहन करणआर नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुंबईत दिला. यावेळई त्यांनी भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष केले. ते म्हणाले, मला वाटतं की त्यांना मानसिक आजराचा त्रास आहे. कुठे विकासाची चर्चा करायची नाही. विरोधी पक्षाच काम सरकारला सूचना करणे, कुठे सरकार चुकत असेल तर विरोध करणे, ही विरोधी पक्षाची भूमिका असते. मात्र, चंद्रकांत दादा असतील किंवा फडणवीस असतील सातत्याने हे सरकार पडणार असल्याचे म्हणत आहेत. सरकार अस्थिर करून प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काम न करण्याची एक व्यवस्था निर्माण करण्याचा काम करायचे आणि जनतेच नुकसान करायचे हाच एकमेव धर्म भाजपचा आहे.

वाचाळ बोलणे घातक

नाना पटोले म्हणाले की, वाचाळ बोलणे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपला आता सत्तेचा रोग झाला आहे. शिवाय त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, मोदींनी महाराष्ट्रांना सुपर स्प्रेडर म्हटले. त्यांना महाराष्ट्र्राची माफी मागावीच लागणार आहे. महाराष्ट्राने कोरोना पसरवला म्हणणं असेल, तर नमस्ते ट्रम्प हे कशासाठी होतं, याच उत्तर त्यांनी द्यावं. कोरोना कुठून पसरला याची वास्तविकता देशाला सांगावी. महाराष्ट्राच्या जनतेवर लांच्छन लावणं हे महाराष्ट्राची जनता कधी ही सहन करणार नाही. मोदी माफी मागत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन चालत राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. अण्णा हजारेंच्या वाईन उपोषणाबद्दल काही बोलणार नाही. कारण बोलण्यासारखं काहीच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

धर्माचे राजकारण

नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा अधिकार असतो. आमच्या पक्षात प्रवेश होत असतात. अजूनही काही पक्ष प्रवेश होतील. कोणी कुठला पक्षात प्रवेश करावा, हा माझ्या जगण्याचा अधिकार आहे. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही कुठलीही प्रलोभनं दाखवत नाहीत. भाजप हे नेहमी धर्माचे राजकारण केले. निवडणुका आल्या की त्यांना मुस्लिम आणि युनिफॉर्म सिव्हिल कोर्ट आठवतो. अशाच पद्धतीचे त्यांचं निवडणुकीचे राजकारण असतं, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी उद्योगपती राहुल बजाज यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, राहुल बजाज यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झालेली आहे. एक उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे व्यक्तिमत्व हरपले आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.