AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

गोदावरी नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलींच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
| Updated on: Jun 12, 2019 | 9:50 AM
Share

जालना : गोदावरी नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. किशोरी कुटे (10) आणि नेहा कुटे (8) अशी या दोन्ही मुलींची नावे आहेत. जालन्यातील अंबडमधील गोरी गंधारी परिसरात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोदावरी नदीतल्या सावळेश्वर येथील पात्रात किशोरी आणि नेहा आपल्या आईसोबत गेल्या होत्या.  मात्र सावळेश्वर नदी पात्रात पाणी नसल्याने त्यांची आई मंगल कुटे या गोरी –गंधारी या ठिकाणी कपडे धुण्यास बसल्या होत्या. त्या दरम्यान किशोरी आणि नेहा या दोघीही सावळेश्वर नदीपात्रात अंघोळीसाठी उतरल्या. नदी पात्रात खेळता खेळता त्या दोघीही खोल पाण्यात गेल्या. त्यावेळी त्या दोघींनाही नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

किशोरी संतोष कुटे (10) आणि नेहा संतोष कुटे (8) अशी या दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत. दोन्ही मुलींच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.