AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray|उद्धव ठाकरेंचा ताण नेमका कोण कमी करतंय? पहिल्यांदाच जगजाहीर नाव सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या एका विशेष सहकाऱ्याचे पहिल्यांदा नाव जाहीर केले. त्यांचे तोंड भरून कौतुक केले. कोणाबद्दल बोलले मुख्यमंत्री, जाणून घेऊयात.

Uddhav Thackeray|उद्धव ठाकरेंचा ताण नेमका कोण कमी करतंय? पहिल्यांदाच जगजाहीर नाव सांगितलं
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 4:45 PM

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिले. ते म्हणजे मुंबईतील 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत 16 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या एका विशेष सहकाऱ्याचे पहिल्यांदा नाव जाहीर केले. त्यांचे तोंड भरून कौतुक केले. कोणाबद्दल बोलले मुख्यमंत्री, जाणून घेऊयात.

आजापरणानंतर पहिलाच संवाद

आजारपणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अगदी ठणठणीत होऊन समोर आले. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी सुरुवातीलाच तुम्हाला वाटले असेल, मी कोरोनाबद्दल बोलणार आहे, म्हणत एक मिश्किल चिमटा काढला. त्यानंतर मुंबईत सुरू असलेली कामे, शिवसेना आपली पाळेमुळे कसे विसरणार नाही म्हणून वचननाम्यातील शक्य असतील ती आश्वासने पूर्ण करू, असे ठासून सांगितले. शिवाय त्यात महत्त्वाचे म्हणजे पाचशे चौरस फुटाखाली घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल आपल्या सहकाऱ्यांचे जाहीरपणे कौतुक केले. त्यात मंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त इक्बाल चहल, महेश झगडे यांची नावे घेत त्यांचे व्यक्तीशः तर आभार मानलेच. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि समस्त मुंबईकराच्या वतीने देखील त्यांचे जाहीर आभार मानले.

आठवणीत रमले

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवरती प्रेम केले. तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेना वचन देते आण पाळतेही. खोटी वचने आम्ही देत नाहीत. जाहीरनाम्यातील अनेक वचने आम्ही पूर्ण केली आहेत. 1966 पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना मुंबईकराच्या आशीर्वादाने मुंबई साभाळत आहे. शिवसेनाप्रमुख स्वतः जातीने जात आणि नालेसफाईपासून सारी कामे पाहत. ते पहात-पहात मी मोठा झालो, अशी आठवण सांगितली.

ती विशेष व्यक्ती कोण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी सुद्धा रस्त्याची कामे मध्यरात्री जाऊन पाहिली. नालेसफाई नाल्यात उतरून पाहिली. दहीसर नदीचे काम असो की अजून काम. हा माझा पूर्ण ताण आता आदित्यने कमी केला आहे. तो रात्री, अपरात्री सर्वांसोबत नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्यासोबत बाहेर जातो. कामांची पाहणी करतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच जाहीर कौतुक केले.

इतर बातम्याः

मोठी बातमी: मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 500 चौ.फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ !

Video | वाघ तो वाघच! Mahindra Xyloला दातांनीच ओढलं, आनंद महिंद्रांना का नवल नाही वाटलं?

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.