Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाची थेट अयोध्येत दखल, रामजन्मभूमीतील महंताची प्रतिक्रिया काय?

Ayodhya Acharya Satyendra Das on Jitendra Awhad Statement about Ram : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या विधानावर थेट अयोध्येतून प्रतिक्रिया आली आहे. रामजन्मभूमीतील महंतानी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी काय म्हटलं आहे? वाचा...

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाची थेट अयोध्येत दखल, रामजन्मभूमीतील महंताची प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 11:49 AM

अयोध्या, उत्तर प्रदेश | 04 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यावर अयोध्येतून प्रतिक्रिया आली आहे. राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळ खाल्ली हेच शास्त्रामध्ये लिहिलं आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे, असं आचार्य सत्तेंद्र दास यांनी म्हटलं आहे.

राम कदम यांचा थेट निशाणा

“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या घरी पूजा असेल तरी मांसाहार करणारा व्यक्ती मांसाहार करत नाही. मंदिरात जाताना माणसाने मांसाहार केला असेल तरी तो जाणं टाळतो. रामचंद्र मांसाहार करत असते तर त्यांना मांसाहार नैवेद्य दिला. त्यांच्या या वक्तव्याला कोणताही आधार नाही. वाल्मिकी रामायण, राम चरित्र मानस या कशातच असा उल्लेख नाही. ठराविक संप्रदायाने कसं खुश करता येईल याचं उत्तम उदाहरण ते देत आहेत, असं राम कदम म्हणालेत.

“आव्हाडांना शिक्षा झालीच पाहिजे”

जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा झाली पाहिजे. FIR दाखल झालाच पाहिजे. आव्हाड आस्तिक आहेत. आस्तिक असून रामचंद्रन नाराज करू नये. प्रमाण दाखवावं आणि दाखवणार नसतील तर माफी मागून स्वतःहून अटक व्हावं, असं राम कदम म्हणालेत.

सामनाचे पत्रकार, प्रवक्ते गप्प का? हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारायचा आहे. ही साधी घटना नाही. भव्य दिव्य मंदिर उभा राहत असताना शरद पवार कंपनी, राहुल गांधी कंपनी, उद्धव ठाकरे का नाराज आहेत?, असा थेट सवाल राम कदम यांनी केला आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.