Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांच्या पुतळ्याच्या निर्मितीत भ्रष्टाचार, तेच पैसे नारायण राणेंसाठी निवडणुकीत वापरले; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Vaibhav Naik on Ravindra Chavan Narayan Rane : ठाकरे गटाच्या नेत्याने रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. सरकारवर गंभीर आरोप करण्यात आलेत. वाचा सविस्तर...

शिवरायांच्या पुतळ्याच्या निर्मितीत भ्रष्टाचार, तेच पैसे नारायण राणेंसाठी निवडणुकीत वापरले; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
वैभव नाईकांची आक्रमक प्रतिक्रियाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 11:36 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये या पुतळ्याचं उद्घाटन झालं. त्यानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. यावरून विरोधक आक्रमक झालेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं वैभव नाईक म्हणालेत. लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्यासाठी महराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारातील पैसे वापरले, असा आरोप नाईकांनी केलाय.

वैभव नाईकांंकडून गंभीर आरोप

आज आम्ही आक्रोश मोर्चा काढतोय. शिवप्रेमींचा संताप आज सरकारला दिसेल. लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी याच भ्रष्टाचारातील पैसे वापरले. राणे यांच्यासाठी मताला एक हजार रुपये वाटल्यामुळेच आता राणेंकडून पालकमंत्र्यांची पाठ राखण होत आहे. देशातल्या कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देणारे नारायण राणे आणि नितेश राणे गप्प का होते?, असं सवाल त्यांनी केलाय.

पुतळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न होतोय. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याकडून दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सिंधुदुर्ग मधल्या वकिलांना फोन येत आहेत. या प्रकरणात आम्ही राजकारण केलं नाही. उलट पुतळा बसवला. त्यावेळी भाजपचे झेंडे लावले होते. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की पुतळा पडला कसा? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असं वैभव नाईक म्हणाले.

मालवण बंदची हाक

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय. मालवणमधील बाजारपेठ आज उत्सर्तपणे बंद ठेवण्यात आली आहे. भरड नाका इथली दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बाजारपेठ बंद आहे. राजकीय पक्षांकडून नव्हे तर स्थानिकांनी हा बंद पाळला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्याच्या बरोबर समोर असणाऱ्या घरातल्या व्यक्तींने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला त्या दिवशीची परिस्थिती सांगितली. ज्या दिवशी पुतळा कोसळला त्या दिवशी खूप जोरदार वारं होतं. पाऊस आणि वारा एकत्र झाल्याने वाऱ्याचा वेग अधिक वाढला. वाऱ्याचा वेग पुतळा पाडणे एवढा होता का हे माहीत नाही मात्र त्यादिवशी वाऱ्याचा वेग अधिक होता, असं राजकोट किल्ल्यासमोरील घरात राहणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.