AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime | वर्धेत विनयभंग करून आरोपी पसार; तीन वर्षांपासून मुंबईत फुटपाथवार, अखेर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

तीन वर्षांपूर्वी शैलेशने एका युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस अटक करतील, या भीतीने तो गावाबाहेर गेला. पण, तो कुठे आहे, याचा पत्ता लागत नव्हता. तीन वर्षांनंतर तो मुंबईत असल्याचं कळलं. पोलीस तीन दिवस त्याचा शोध घेत होते. शेवटी तो मुंब्रा रेल्वेस्थानकावर सापडला.

Wardha Crime | वर्धेत विनयभंग करून आरोपी पसार; तीन वर्षांपासून मुंबईत फुटपाथवार, अखेर अडकला पोलिसांच्या जाळ्यात
तीन वर्षांपासून पसार आरोपी सावंगी पोलिसांकडून अटकेत. Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 3:21 PM
Share

वर्धा : शैलेश मडावी (Shailesh Madavi) याने सावंगी पोलीस (Sawangi Police) ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्याप्रकरणी त्याच्यावर 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता. अखेर सावंगी पोलिसांनी मुंबई येथे जात त्याला अटक केली. सावंगी पोलीस मुंबई येथे पोहोचले असता त्यांना आरोपी शैलेशचा थांगपत्ता नव्हता. तब्बल तीन दिवस पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. शैलेश हा मिळेल ते काम करून फुटपाथवर राहत होता. कल्याण, दादर, मुंब्रा असा फिरत असल्याची माहिती होती. अखेर पोलिसांनी फुटपाथवरील काही मुलांना त्याचा फोटो दाखविला असता शैलेश हा मुंब्रा रेल्वेस्थानकावर दिसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर पोलीस मुंब्रा रेल्वेस्थानकावर (Mumbra Railway Station) गेले आणि फुटपाथवर बसून असलेल्या आरोपी शैलेशला अटक केली.

मुंबईतून घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपी पसार झाला होता. मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपीचा सावंगी पोलिसांनी अटक केलीय. आरोपीला सावंगी पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले. हा आरोपी मुंबई येथे फुटपाथवर वास्तव्यास होता. साटोडा येथील शैलेश देवीदास मडावी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण

तीन वर्षांपूर्वी शैलेशने एका युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस अटक करतील, या भीतीने तो गावाबाहेर गेला. पण, तो कुठे आहे, याचा पत्ता लागत नव्हता. तीन वर्षांनंतर तो मुंबईत असल्याचं कळलं. पोलीस तीन दिवस त्याचा शोध घेत होते. शेवटी तो मुंब्रा रेल्वेस्थानकावर सापडला. गेली तीन वर्षे तो भटकत होता. मिळेल ते काम करून दिवस काढत होता. फुटपाथवर दिवस काढत होता. आधी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करत होता. पण, परत आल्यास पोलीस आपल्याला अटक करतील, अशी त्याला भीती होती. त्यामुळं तो काही घरी परत येत नव्हता. शेवटी पोलीस तिथं गेले नि त्याला ताब्यात घेतले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.