AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू; महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने पुन्हा चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका घेतलेली नाही. मनसेने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. पहिल्या टप्प्याची निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होत आहे. पण मनसेचा कुठेही आवाज दिसत नाहीये. त्यामुळे मनसे निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा संभ्रम आहे. तसेच मनसे महायुतीत येणार की नाही याबाबतचा संभ्रम असतानाच शिंदे गटाच्या बड्या नेत्याने एक विधान केलंय.

राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू; महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने पुन्हा चर्चा
राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू
| Updated on: Apr 06, 2024 | 12:56 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पत्ते खोललेले नाहीत. राज ठाकरे महायुतीत येणार की नाही याबाबत मनसेकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतरही राज यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. राज ठाकरे यांचा येत्या 9 एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळावा आहे. त्यात ते भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापूर्वीच महायुतीच्या एका नेत्याने मनसे आणि महायुतीच्या युतीबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीतील एक प्रमुख नेते आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मनसेसोबतच्या युतीवर विधान करून चर्चांना तोंड फोडले आहे. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत येणार की नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागतच होईल. रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत केले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांची सभा आहे आणि या सभेच्या दिवशी राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करू शकतात, असं संजय शिरसाट म्हणाले. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते.

कुठलेही मतभेद नाहीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणची जागा श्रीकांत शिंदे हेच लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरही संजय शिरसाट यांनी विधान केलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीसाठी बरीच विकासाची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांचे या उमेदवारीच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे. कुठलेही मतभेद नाहीत. कुठलाही समन्वयाचा अभाव नाहीये. आम्ही सर्व मिळून श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.

राजीनामा देण्याची गरज नाही

जे काही दुसरे रुसवे फुगवे असतील, जे काही गैरसमज असतील ते वरिष्ठ नेते एकत्र बसवून मिटवण्याचा प्रयत्न करतील, असंही त्यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने रामदास कदम यांना आता राजीनामा देण्याची गरज नाही. रामदास कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तोफ धडाडणार

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ येत्या 9 एप्रिल रोजी धडाडणार आहे. शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. यावेळी ते महायुतीत जाण्याबाबत आणि निवडणुका लढवण्याबाबतची महत्त्वाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.