AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्टात मुली नेमक्या कुणाला नकोत? कोणत्या जिल्ह्यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती नॅशनल फॅमिल हेल्थच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. ही बाब महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे.

महाराष्टात मुली नेमक्या कुणाला नकोत? कोणत्या जिल्ह्यांनी 'बेटी बचाव'चा नारा सार्थ ठरवला? वाचा सविस्तर
Girl
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 3:42 PM

महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती नॅशनल फॅमिल हेल्थच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. ही बाब महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात -54 अंकांची घट झालीय, तर इतर तब्बल 17 जिल्ह्यातही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे. राज्यातली आकडेवारी आणखी धक्कादायक आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत 11 अंकांची घट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 1 हजार मुलांच्या तुलनेत 924 मुली होत्या ती आकडेवारी आणखी घटून 1000 मुलांमागे केवळ 913 मुली आहेत.

मुली नेमक्या नकोत कुणाला?

हा सर्वे राज्यातील लोकांची मानसिकता दर्शवणारा आहे. पुणे, हिंगोली, औरंगाबाद, भंडारा, मुंबई, बीड, जालना जळगाव जिल्यात मुलींची संख्या 1000 मुलींच्या तुलनेत 900 च्या खाली आली आहे. औरंगाबादेत तर ही आकडेवारी आणखी घटून 875 वर आली आहे. गेल्या सर्वेक्षाच्या तुलनेत ही सर्वात मोठी घट आहे. भंडाऱ्यात गेल्या सर्वेक्षणावेळी 1000 मुलांमागे 1204 मुली होत्या ती संख्या आता मोठ्या प्रमाणत घटली आहे. आता ती आकडेवारी 1000 मुले, 897 मुली अशी झाली आहे. तर बीड हिंगोली भडाऱ्यातही हा फरक वाढत गेलाय.

यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला

अमरावती, गडचिरोरीली, धुळे उस्मानाबाद या जिल्ह्यांनी बेटी बचावचा नारा सार्थ ठरवला आहे. अमरावतीत 1090 मुली 1000 मुली अशी आकडेवारी आहे. गोंदिया, कोल्हापूर, लातूरमध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असणारे जिल्हे जास्त असल्यानं अजून मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट जाणवतंय. अनेकांना अजून वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. त्यामुळे ही मोठी तफावत दिसून येतेय.

Video: जिराफाची छेड काढणं गेंड्याला महागात, लोक म्हणाले, आता हा कुणाच्याच वाटेला जाणार नाही!

Rajesh tope : कोविडनं मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 50 हजाराची मदत नेमकी कधी मिळणार? अटी काय? टोपे म्हणतात

Omicron Variant: ओमिक्रॉन म्हणजे काय? कसा लागला या वेरिएंटचा शोध?

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.