AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झाले तरीही पाण्यासाठी बोंबाबोंब, संतप्त महिलांनी नप कार्यालयाचे कुलूप का फोडले?

दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत आहे. आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालयाचे कुलूप हातोड्याने फोडत नगरपंचायतमध्ये राडा केला.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झाले तरीही पाण्यासाठी बोंबाबोंब, संतप्त महिलांनी नप कार्यालयाचे कुलूप का फोडले?
| Updated on: Jun 18, 2023 | 3:34 PM
Share

विवेक गावंडे, प्रतिनिधी, यवतमाळ : उन्हाळा असल्याने पाण्याची जास्त गरज आहे. परंतु, ढाणकीत पाणीसमस्येने उग्र रूप धारण केले. महिलांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते. नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर तिथं विभाग प्रमुख कधी प्रभारावर असल्याचे सांगतात. तर बहुधा उपस्थित राहत नाही. तक्रार कुणाकडं करावी, असा प्रश्न निर्माण होत होता. शिवाय तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संतप्त महिलांना आज नगरपंचायत कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले. दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत आहे. आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालयाचे कुलूप हातोड्याने फोडत नगरपंचायतमध्ये राडा केला. संपूर्ण उन्हाळाभर शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत होता.

या भागातील महिला संतप्त

आता उन्हाळा संपून पावसाची प्रतीक्षा असतानाही 20 दिवस पाणीपुरवठा होत नाही. यावर नगरपंचायत प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. ही समस्या सांगण्यासाठी कार्यालयात गेल्यास विभाग प्रमुख हजर राहत नाहीत, असा महिलांचा आरोप आहे. प्रभाग क्रमांक 10, 11, 12, 16 मधील महिला संतप्त झाल्या.

यांनी ऐकून घेतल्या समस्या

आपल्या लहान मुलांसह त्या नगरपंचायत कार्यालयावर धडकल्या. संतप्त महिलांचा राग शांत करण्यासाठी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक शेख खाजा शेख कुरेशी हे महिलांना सामोरे गेले. त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून यावर निश्चितच नगरपंचायत प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे संतप्त महिलांचा राग काही वेळ निवळला.

विभाग प्रमुखांनी नेहमी गैरहजेरी

ढाणकी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. मात्र समस्या जैसे थेच आहेत. आजही शहराला पूर्णपणे पाणी उपलब्ध होत नाही. कार्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख हे प्रभागावर आहेत. शहरात कोणतीही विकास काम सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला आरोग्य आणि पाणी या विभागाच्या प्रमुख कार्यालयात सतत गैरहजर राहतात. त्यामुळे या समस्यांनी उग्ररूप धारण केले आहे.

समस्या मांडण्यासाठी नागरिक कार्यालयात आल्यास केव्हाच विभाग प्रमुख हजर राहत नाहीत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी संतप्त महिलांची मागणी होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.