Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal : चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत; चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला; परंतु प्रवाशांत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता.

Yavatmal : चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत;  चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला
चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत; चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळलाImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 10:51 AM

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी येथील एसटी (ST) आगाराची बस गडचांदूरकडे प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक बसचे मागील चाक निखळून ते नदीत (River) पडले. परंतु यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने मोठा अपघात टाळला. या बसमध्ये त्यावेळी 18 प्रवासी बसून होते. ही घटना मंगळवारी दुपारी चारगावजवळ घडली आहे. आत्तापर्यंत एसटीचे अनेक अपघात झालेले आहेत. परंतु नुकताच झालेला अपघात हा विचित्र आहे. कारण अचानक गाडीचं चाक निघाल्याने चालकाची भंबेरी उडाली होती. चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांचा जीव वाचला आहे. सध्या त्या गाडीची पाहणी करण्यात येत आहे. कारण अचानक अपघात झाल्याने आगारावरती टीकेची झोड उठली आहे.

ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी 18 प्रवासी एसटीत होते

वणीवरून गडचांदूरला बस क्रमांक एम एच 40-8953 जात होती. या बसमध्ये जवळपास 18 प्रवासी तसेच नदीच्या पुलावर चालत्या बसची मागील दोन चाके निखळली. यातील एक चाक नदीत पडले, तर दुसरे चाक रस्त्यात अडकल्याने जाग्यावर थांबले. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला त्यावेळी चालक मुलनकर व वाहक अविनाश बोबडे हे एसटीत होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशी देखील घाबरले होते. ज्यावेळी दोन्ही चाकं निघाली, त्यावेळी गाडीत आरडाओरड आणि गोंधळ सुरु झाला होता. पण एसटी थांबल्यानंतर गोंधळ पुर्णपणे बंद झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला; परंतु प्रवाशांत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. चारगाव ते गडचांदूरपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदी शेजारी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात एसटीच्या गलथान कारभारावरती सुद्धा नागरिकांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे एसटीचं आगार पुन्हा चर्चेत आलं आहे. ना दुरुस्त गाडी का दिली अशी विचारणा लोक करीत आहेत.

बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.