AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aslam Shaikh | उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं, भाजपच्या पोटात दुखतंय : अस्लम शेख

भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. प्रत्येक दिवशी एक नेत्याला समोर करुन बदनामीचं काम केलं जात आहे, असं अस्लम शेख म्हणाले

Aslam Shaikh | उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं, भाजपच्या पोटात दुखतंय : अस्लम शेख
| Updated on: Jul 01, 2020 | 9:16 PM
Share

मुंबई : “देशातील सध्याची परिस्थिती पाहिली असता, ज्या (MLA Aslam Shaikh Criticize BJP) पद्धतीने उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं आहे. केंद्राने त्यांचे कौतुक केलं आहे. राज्य सरकारने कोरोना असताना देखील मुंबईमध्ये चांगलं काम केलेलं आहे. भाजपला हे समजत नाही”, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी (MLA Aslam Shaikh Criticize BJP) केली आहे.

“भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. प्रत्येक दिवशी एक नेत्याला समोर करुन बदनामीचं काम केलं जात आहे. उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार फोल ठरतेय, असं म्हणत भाजपकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे (MLA Aslam Shaikh Criticize BJP).

शरद पवारांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाही : अस्लम शेख

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वादावरही अस्लम शेख यांनी मत मांडलं आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.

“राहुल गांधी यांनी आपलं मत मांडलं आणि शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवारांनी राहुल गांधींबद्दल काय विधान केलं, त्याला इतकं महत्त्व नाही”, असं ते म्हणाले.

“शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. कोणी कितीही म्हटलं, तरी हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे”, असा विश्वास अस्लम शेख यांनी व्यक्त केला (MLA Aslam Shaikh Criticize BJP).

संबंधित बातम्या :

संकट टळलं, यंत्रणा सज्ज होती, आता देवाकडे प्रार्थना, हे वादळ देशाबाहेर जावं : अस्लम शेख

Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.