AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या तापमानाने होरपळणार भारतातील ६० कोटी लोकं, वैज्ञानिकांच्या अभ्यासात खळबळजनक खुलासा

तापमान वाढीमुळे लू, चक्रिवादळ, पूर अशा संकटांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जागतिक स्तरावरील समुद्रातील पाण्यामध्ये वाढ होईल.

वाढत्या तापमानाने होरपळणार भारतातील ६० कोटी लोकं, वैज्ञानिकांच्या अभ्यासात खळबळजनक खुलासा
| Updated on: May 26, 2023 | 4:24 AM
Share

नवी दिल्ली : वाढत्या तापमानावर नवे अध्ययन समोर आलंय. जगात वाढत्या तापमानामुळे इशारा देण्यात आला आहे. जगात जास्त लोकसंख्येच्या देशांना याचा जास्त फटका बसणार आहे. भारतात वाढत्या तापमानामुळे सुमारे ६० कोटी लोकांना फटका बसणार आहे. जग वातावरणातील बदलामुळे झुंज देत आहे. तरीही ग्लोबल वार्मिंगचे संकट काही टळताना दिसत  नाही. वैज्ञानिकांच्या मते २०८०-२१०० पर्यंत पृथ्वीवरील तापमानात २.७ डिग्री सेल्सिअसची वाढ होईल. याचा पावसावर मोठा परिणाम पडणार आहे. तापमान वाढीमुळे लू, चक्रिवादळ, पूर अशा संकटांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जागतिक स्तरावरील समुद्रातील पाण्यामध्ये वाढ होईल. बर्फ वितळून समुद्राच्या पाण्यात येईल.

भारतातील अर्ध्या लोकसंख्येवर होणार परिणाम

संशोधनात ही बाब समोर आली की, २.७ डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ होणार आहे. याचा परिणाम भारतातील अर्ध्या लोकसंख्येवर होणार आहे. हे संशोधन जर्नल नेचर सस्टेनेबिलीटीमध्ये प्रकाशित झालंय. हे अध्ययन एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल सिस्टम इंस्टिट्यूटच्या अर्थ कमिशन आणि नानजिंग युनिव्हर्सिटीने केलंय. भारतापाठोपाठ भीषण गर्मीचा सामना हा नायजेरीया देशाला करावा लागणार आहे. नायजेरीयातील ३० कोटी लोकं या गर्मीचा सामना करतील.

सहा कोटी लोकं करतात लूचा सामना

तापमान वृद्धी ही १.५ डिग्री सेल्सिअस झाल्यास ९ कोटी लोकांना वाढत्या तापमानाचा फटका बसेल. जागतिक स्तरावर एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे. समजा ग्लोबल स्तरावर तापमान ३.६ डिग्री सेल्सिअस वाढली तर ४.४ डिग्री सेल्सीअस तापमानात वाढ वाढ होईल. अशावेळी जगातील अर्ध्या लोकांना तापमान वाढीचा फटका बसेल.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने तापमान वाढीचे चटके बसायला लागले आहेत. शहरात सिमेंटचे रस्ते असल्याने तापमानात वाढ होते. कंपन्या असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूर निघतो. याचाही परिणाम तापमान वाढीवर होते. जागतिक तापमान वाढ होण्याचा धोका आहे. असे झाल्यास याची झळ बहुतेक लोकांना सोसावी लागणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.