AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात विधानसभेसाठी ‘आप’ची ‘स्वबळा’ची घोषणा; तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का?

गेल्या आठवड्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं.

गुजरात विधानसभेसाठी 'आप'ची 'स्वबळा'ची घोषणा; तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का?
Arvind Kejriwal
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 1:33 PM

अहमदाबाद: गेल्या आठवड्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याच वेळी आम आदमी पार्टीने आगामी गुजरात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का बसला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (AAP to contest on all seats in Gujarat assembly polls, says Arvind Kejriwal)

2022मध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठं विधान केलं आहे. केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. केजरीवाल आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

काँग्रेस भाजपमध्ये दोस्ताना

अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर केजरीवाल थेट आश्रम रोडवरील आपच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते वल्लभ सदन हवेली मंदिरात पोहोचले आणि तिथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दोन्ही पक्ष गुजरातमध्ये आपआपलं दुकान चालवत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला मदत हवी तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांना मालाचा पुरवठा केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये 27 वर्षांपासूनचा दोस्ताना आहे. ही दोस्तीच ते निभावत आहेत. त्यामुळे जनतेचं मात्र शोषण होत आहे, असं केजरीवाल म्हणाले.

गुजरात मॉडल आम्ही दुरुस्त करू

सध्या काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. व्यापारी वर्ग बिथरलेला आहे. याला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. गुजरात मॉडल सध्या खराब परिस्थिती आहेत. आम्ही हे मॉडल दुरुस्त करू, असं ते म्हणाले. यापूर्वी केजरीवाल फेब्रुवारी महिन्यात सूतरला गेले होते. आपने गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी मोठं यश मिळवलं होतं.

तिसऱ्या आघाडीला धक्का

प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. त्यात तिसरी आघाडी स्थापन होण्यावरही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही शरद पवार हे देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, असं सांगितलं होतं. मात्र, हे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच आपने एकला चलो रेची भूमिका घेतल्याने तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (AAP to contest on all seats in Gujarat assembly polls, says Arvind Kejriwal)

संबंधित बातम्या:

बिहारमध्येही पुतण्यावर काका भारी, पासवानांच्या पक्षात फूट, कुटुंबही विस्कटलं; वाचा सविस्तर

हे राम! राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी; देशभर खळबळ

पंजाबमध्ये बसपा-अकाली दलाच्या आघाडीचं राजकीय गणित काय?; कुणाला बसणार धक्का, वाचा सविस्तर

(AAP to contest on all seats in Gujarat assembly polls, says Arvind Kejriwal)

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.