AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadkari on Toll : 60 कि.मी. पर्यंत एकच टोल, गडकरींची घोषणा, अवैध टोल नाके तीन महिन्यात हटवणार, अवैध वसुलीचं काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय सांगितला. महत्वाच्या मार्गावर 60 कि. मिटरच्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. साठ किलो मिटरच्या अंतरावर आता एक टोल नाका असणार असून, महामार्गाजवळ राहणाऱ्या वाहनधारकांना पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना सांगितलेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. 

Gadkari on Toll : 60 कि.मी. पर्यंत एकच टोल, गडकरींची घोषणा, अवैध टोल नाके तीन महिन्यात हटवणार, अवैध वसुलीचं काय?
Narayan GadkariImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:30 PM

नवी दिल्लीः भारतात भविष्यात महामार्गावरुन जर तुम्ही लांबचा प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी लोकसभेत सांगितले की, महामार्गावरुन (Highway) प्रवास करत असताना सरकारकडून एका ठराविक मर्यादेपर्यंतच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ (Toll Plaza) राहणाऱ्या आणि महामार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना पास देण्याची योजना आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महामार्गावरुन प्रवास करत असताना वसूल करण्यात येत असलेल्या टोल आणि रस्तेविषयक लोकसभेत माहिती देताना हा टोलविषयीचा निर्णय त्यांनी सांगितला. यावेळी त्यांनी सांगितले की, महामार्गावर टोलनाक्यांची संख्या मर्यादित असणार आहे म्हणजेच 60 किलोमीटरच्या आत दुसरा टोल नाका नसावा असा नियम करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महामार्गाजवळ राहणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांना पास देण्यात येणार असून या पासमुळे त्यांच्याकडून टोल वसूल केला जाणार नाही. केंद्र सरकारची ही योजना तीन महिन्यात लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टोल नाके आता बंद ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय सांगितला. महत्वाच्या मार्गावर 60 कि. मिटरच्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. साठ किलो मिटरच्या अंतरावर आता एक टोल नाका असणार असून, महामार्गाजवळ राहणाऱ्या वाहनधारकांना पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना सांगितलेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

टोल नाक्यांची संख्या कमी

नितीन गडकरी यांनी टोल नाक्याविषयी बोलताना सांगितले की, येत्या तीन महिन्यात देशातील टोल नाक्यांची संख्या कमी करणार असून महामार्गावर 60 किलोमीटरपर्यंत एकच टोल असणार आहे. त्यापेक्षा जादा टोल नाके एवढ्या अंतरावर असतील तर ते बंद करण्यात येणार आहेत.

वाहनधारकांना मोठा दिलासा

महामार्गाजवळ राहणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारच्या या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गाजवळ म्हणजेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या व सतत टोल नाक्यावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल घेतला जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या

ED Raid : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे रश्मी ठाकरेंच्या भावाची ठाण्यातली संपत्ती जप्त करण्यात आलीय?

Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याच्या मालमत्तेवर ईडीची टाच, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नितेश राणे यांची मागणी

Court on ST Strike : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कामगार कामावर का नाहीत? सदावर्तेंनी न सांगितलेले कोर्टाचे 5 सवाल

एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.