Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे आनंद महिंद्रा दुःखी! ट्विट करत व्यक्त केला योजनेवरील विश्वास

सैन्यदलातील सर्व नवीन भरतींसाठी प्रवेशाचे वय 17.5 ते 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, विरोधानंतर केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत ही भरती करणे शक्य नसल्याने अग्निवीरांच्या भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा 2022च्या भरती चक्रासाठी 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याची घोषणा केली.

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे आनंद महिंद्रा दुःखी! ट्विट करत व्यक्त केला योजनेवरील विश्वास
Anand Mahindra tweet ViralImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:31 AM

नवी दिल्ली:अग्निपथ योजने (Agneepath Scheme) मुळे झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख झाले आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली, तेव्हा मी म्हणालो होता आणि आताही मी पुन्हा तेच सांगतो की या योजनेअंतर्गत अग्निवीरांना मिळणारी शिस्त आणि कौशल्ये त्यांना रोजगारक्षम बनवतील. महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांची भरती करण्याच्या संधीचे स्वागत करतो.” हे ट्विट केलंय महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी या योजनेचं स्वागत केलंय आणि योजनेनं तरुणांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

आनंद महिंद्रांनी आज, सोमवारी सकाळी केलेलं ट्विट

सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान

भारतीय तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलाच्या नियमित संवर्गात सेवा देण्याची मुभा देणाऱ्या अग्निपथ योजनेची घोषणा १४ जून रोजी करण्यात आल्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, झारखंड, आसामसह विविध राज्यांमध्ये निदर्शने सुरू झाली. काही ठिकाणी आंदोलन तीव्र होताच निदर्शकांनी गाड्यांना आग लावणे, वाहने जाळणे आणि खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे या दोन्ही गोष्टींचा भडिमार केला.

यंदा एकूण 46 हजार अग्निवीरांची भरती

यंदा एकूण 46 हजार अग्निवीरांची भरती होणार आहे, पण नजीकच्या काळात ती 1.25 लाखांवर जाईल, असे एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. सैन्यदलातील सर्व नवीन भरतींसाठी प्रवेशाचे वय 17.5 ते 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, विरोधानंतर केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत ही भरती करणे शक्य नसल्याने अग्निवीरांच्या भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा 2022च्या भरती चक्रासाठी 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याची घोषणा केली.

भरती धोरण वादग्रस्त- काँग्रेस

‘अग्निपथ’ योजनेमुळे तरुणांना संरक्षण व्यवस्थेत सामील होण्याची आणि देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळते, याकडे सरकार लक्ष वेधत असले, तरी काँग्रेसने म्हटले होते की, भरती धोरण वादग्रस्त आहे, अनेक धोके पत्करणारे आहे, सैन्यदलांच्या दीर्घकालीन परंपरा आणि आचारविचारांना धक्का पोहोचवते आणि या योजनेअंतर्गत भरती झालेले सैनिक देशाच्या संरक्षणासाठी अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित आणि प्रेरित होतील याची शाश्वती नाही.

प्रशिक्षण कालावधीसह 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी नोंदणी

अग्निवीरांना प्रशिक्षण कालावधीसह 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी नोंदणी केली जाईल. चार वर्षांनंतर केवळ 25 टक्के अग्निवीरांना गुणवत्ता, इच्छा आणि वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधारे नियमित संवर्गात कायम ठेवले जाईल किंवा त्यांची पुन्हा नेमणूक केली जाईल. त्यानंतर हे 25 टक्के अग्निवीर आणखी 15 वर्षांच्या पूर्ण मुदतीसाठी काम करतील.

योजना मागे घेतली जाणार नाही

हा विरोध सुरू असतानाच लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही योजना मागे घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले आणि ‘देशाला तरुण करण्यासाठी उचललेले हे एकमेव पुरोगामी पाऊल आहे’, असे सांगितले.या योजनेवर आज सकाळी (सोमवार २० जून २०२२) आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलंय. हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरतंय.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.