AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प. बंगालमध्ये भाजपाला आणखी एक धक्का, नाराज खासदार अर्जुन सिंह तृणमूलमध्ये परतले. 11 महिन्यांत 5 मोठ्या नेत्यांची भाजपाला सोडचिठ्ठी

२०१९ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि बरैकपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी बंगालच्या भाटपारा विधानसभा मतदारसंघातून ते ४ वेळा आमदार राहिलेले आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. गेल्या ११ महिन्यात भाजपातून ५ मोठ्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

प. बंगालमध्ये भाजपाला आणखी एक धक्का, नाराज खासदार अर्जुन सिंह तृणमूलमध्ये परतले. 11 महिन्यांत 5 मोठ्या नेत्यांची भाजपाला सोडचिठ्ठी
BJP MP in TrinmoolImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 8:18 PM

कोलकाता . बंगाल (West Bangal)विधानसभा निवडणुकीत भाजपाचा (BJP)पराभव झाल्यानंतर, आता राज्यात ममता यांच्या तृणमूल काँग्रेसकडे राजकीय (Trinmool congress)नेते परतताना दिसत आहेत. . बंगालच्या बरैकपूरचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. अर्जुन सिंह हे प. बंगाल भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. २०१९ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि बरैकपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी बंगालच्या भाटपारा विधानसभा मतदारसंघातून ते ४ वेळा आमदार राहिलेले आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. गेल्या ११ महिन्यात भाजपातून ५ मोठ्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपा नेतृत्वावर अर्जुन सिंह यांची टीका

एसी खोल्यांत बसून राजकारण केले जात नाही. त्यासाठी जनतेत जावे लागते आणि त्यांच्याशी संपर्क ठेवावा लागतो. त्यासाठी भाजपाला प्रयत्न करण्याची गरज आहे. भाजपात इतरांना जबाबदार धरण्यात येते. भाजपात असलेल्या दोन तृणमूलच्या खासदारांनीही राजीनामे देऊन परतावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अर्जुन सिंह नाराज

पक्षात गेल्या सहा महिन्यांपासून महत्त्व कमी करण्यात आल्याने अर्जूनसिंह नाराज होते. तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पक्षश्रेष्ठी सक्रिय झाले, मात्र त्यांचे फोन अर्जुन सिंह घेत नव्हते, अशी माहिती आहे.

खासदारकीचा राजीनामा देणार नाही

पक्ष बदलला असला तरी लगेच खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपातील दोन तृणमूलमुलच्या खासदारांनी राजीनामा दिला की आपणही त्यांच्यासोबतच राजीनामा देऊ असे त्यांनी सांगितले आहे. तृणमूलचे शिशिर अधिकारी आणि सुनील मंडल या तृणमूलच्या दोन खासदारांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता, मात्र त्यांनीही पदाचा राजीनामा दिलेला नाही. तूर्तास हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांकडे आहे.

गेल्या ११ महिन्यांत ५ मोठ्या नेत्यांचा भाजपाला रामराम

बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सफलता मिळाली नाही, त्यानंतर जून २०२१ मध्ये मुकुल रॉय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यावंतर राजीव बॅनर्जी, बाबुल सुप्रियो आणि विश्वजीत दास या बड्या नेत्यांनीही रामराम ठोकला. सध्या बॅनर्जी हे त्रिपुराचे प्रभारी आहेत तर बाबुल सुप्रियो आमदार झाले आहेत.

‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.