AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीला आणखी एक झटका लागण्याची शक्यता, हा पक्ष भाजपच्या संपर्कात?

India alliance : इंडिया आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण तिसरा पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. याआधी आप आणि तृणमुल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रसच्या प्रयत्नांना मोठा झटका लागला आहे.

इंडिया आघाडीला आणखी एक झटका लागण्याची शक्यता, हा पक्ष भाजपच्या संपर्कात?
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 3:29 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीला आधीच दोन धक्के बसले आहे. त्यानंतर आता इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्यांचं स्पष्ट केलं. त्यानंतर आम आदमी पक्षाने देखील पंजाबमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला होता. आता बिहारच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण काही काळापासून विरोधी पक्षांवर नाराज असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

पीएम मोदी, शाह आणि नड्डा यांच्यात चर्चा?

सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांच्याबाबत भाजपच्या शीर्ष नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात नितीश कुमार यांच्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात लवकरच मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

राहुल गांधीच्या सभेला उपस्थित राहणार नाही

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘भारत जोडो न्याय यात्रेला देखील उपस्थित राहणार नाहीयेत. ३० जानेवारीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पूर्णिया येथे सभा होणार आहे. नितीश यांचा 30 जानेवारीला पाटणा येथे कार्यक्रम असल्याने ते या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो.

अलीकडेच एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नितीश कुमार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. नितीश कुमार यांंच्यासाठी पुन्हा येण्याचे मार्ग मोकळे आहेत का?” त्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले होते – कोणाचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल.” याआधी ते नितीश कुमार यांच्यासोबत कोणतीही युती करण्यास नकार देत होते. पण आता त्यांनी असे म्हटलेले नाही.

भाजपने फोडला प्रचाराचा नारळ

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा नारळ फोडला आहे. आज भाजपकडून व्हिडिओ शेअर करत नवं गाणं प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा असणार आहेत. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वातच या निवडणुका लढवल्या जाणार आहेत.

27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.