AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुमार विश्वासांची शायरी काँग्रेसच्या जिव्हारी, तरी मंजू शर्मांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

राजस्थान सरकारने प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या पत्नीवर मोठी जबाबदारी टाकली आहे. मंजू शर्मा यांची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.

कुमार विश्वासांची शायरी काँग्रेसच्या जिव्हारी, तरी मंजू शर्मांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
| Updated on: Oct 15, 2020 | 11:13 AM
Share

जयपूर : राजस्थान सरकारने प्रसिद्ध कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्या पत्नीवर मोठी जबाबदारी टाकली आहे. मंजू शर्मा (Manju Sharma) यांची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. (Ashok gehlot government Kumar Vishwas Wife Manju Sharma Rajasthan Public Service Commission)

बुधवारी राजस्थान सरकारने लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासह सदस्यांची नियुक्ती केली. यामध्ये कुमार विश्वास यांच्या पत्नीवर सरकारने ही मोठी जबाबदारी टाकली आहे.

कुमार विश्वास यांची पत्नी मंजू शर्मा राजस्थानच्या अजमेरच्या रहिवासी आहे. सिव्हील लाइन्स, अजमेर येथील रहिवासी मंजू शर्मा यांची 1994- 95 मध्ये हिंदीच्या प्राध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत असताना कुमार विश्वास यांच्याशी त्यांची भेट झाली. भेटीनंतर दोघांमध्ये खूप चांगली मैत्री जमली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

कुमार विश्वास यांची मुख्यमंत्री गेहलोतांशी वाढती जवळीक

राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कुमार विश्वास यांच्या पत्नीची नियुक्ती झाल्यापासून बर्‍याच चर्चांना सुरुवात झाली आहेत. कुमार विश्वास यांची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी जवळीक वाढत चालली आहे. तसंच कुमार विश्वास यांना अशोक गहलोत सरकारच्या 2019 च्या कला संस्कृती विभागाच्या कार्यक्रमातही आमंत्रित करण्यात आले होते, असाही धागा आता जोडला जात आहे.

कुमार विश्वासांची शायरी काँग्रेसच्या जिव्हारी, तरी मंजू शर्मांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

कवी कुमार विश्वास आपल्या कवितांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. डिसेंबर 2019 मध्ये राजस्थानातील जयपुरमध्ये झालेल्या कवी संमेलनामध्ये कुमार विश्वास यांनी राहुल गांधी यांच्यावर कवितेमधून जोरदार टोलेबाजी केली होती. ‘अधूरी जवानी का क्या फायदा, बिन कथानक कहानी का क्या फायदा, जिसमें धुलकर नजर भी ना पावन बनी, आंख में ऐसे पानी का क्या फायदा’, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. ही शायरी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. बरेच दिवस या शायरीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर ट्रेंड होता.

भूपेंद्र सिंह राजस्थान लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष

राजस्थान लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्या वास्तविक राजकीय हेतूने होत असतात म्हणूनच मंजू शर्मा यांच्या नियुक्तीनंतर अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. अशावेळी व्हीआरएस घेतलेल्या राजस्थानचे पोलीस महासंचालक डॉ. भूपेंद्र सिंह यांना राजस्थान लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.

(Ashok gehlot government Kumar Vishwas Wife Manju Sharma Rajasthan Public Service Commission)

संबंधित बातम्या

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांची घराबाहेर लावलेली फॉर्च्युनर चोरीला

राजकीय टोलेबाजी! पवार, फडणवीस आणि कुमार विश्वास यांची शायरी

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.