Tomato Price : संधीचं सोनं! या देशाकडून स्वस्तात टोमॅटोची खरेदी, भारतात मोठी कमाई

Tomato Price : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 120 रुपये ते 160 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. काही भागात तर चांगल्या टोमॅटोला यापेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. त्याचाच फायदा भारतातील काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर शेजारील देशाची अशी चांदी होत आहे.

Tomato Price : संधीचं सोनं! या देशाकडून स्वस्तात टोमॅटोची खरेदी, भारतात मोठी कमाई
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 2:37 PM

नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 120 रुपये ते 160 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. काही भागात तर चांगल्या टोमॅटोला यापेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. हा दर 200 रुपयांपेक्षा अधिक आहे. काही व्यापाऱ्यांनी या संधीचं सोनं केलं आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहारमधील काही व्यापाऱ्यांनी त्यावर चांगला पर्याय शोधला आहे. स्वस्तात टोमॅटो खरेदी करुन ते उत्तर भारतात महागड्या दराने त्याची विक्री करत आहे. टोमॅटोच्या बाजारातील अभावाचा फायदा भारतातील काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर शेजारील देशाची अशी चांदी होत आहे.

असा केला जुगाड गेल्या महिनाभरापासून देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी टोमॅटो शंभर तर कुठे दोनेशेच्या घरात मिळत आहे. याचा काही व्यापाऱ्यांनी फायदा उचलला आहे. त्यांनी नेपाळमधून स्वस्तात टोमॅटोची खरेदी करुन त्याची विक्री उत्तर भारतात सुरु केली आहे. नेपाळची सीमा जवळ असल्याने भारतीय व्यापारी या ठिकाणी जाऊन स्वस्तात टोमॅटोची खरेदी करत आहेत. टोमॅटोच नाही तर इतर भाजीपाला पण स्वस्त असल्याने त्याचा फायदा होत आहे.

किंमती अगदी स्वस्त सीमाभागात, धारचूला, बनबसा येथील लोक आणि आजूबाजूचे व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी नेपाळमध्ये जात आहेत. या ठिकाणी किंमती अगदी स्वस्त आहेत. नेपाळमध्ये काही ठिकाणी टोमॅटो 25 ते 30 रुपये किलो तर काही ठिकाणी 100 रुपये ते 110 रुपये नेपाळी रुपये म्हणजे 62 ते 69 भारतीय रुपये अशा भावाने मिळत आहेत. भारतात हेच टोमॅटो दुप्पट किंमतीला विक्री करुन डबल नफा कमावल्या जात आहे.

हे सुद्धा वाचा

नेपाळमध्ये जोरदार उत्पादन उत्तर भारतात मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पण नेपाळमध्ये सुरुवातीचा पाऊस जोरदार झाल्याने पिकांचे चांगले उत्पन्न झाले आहे. भारतीय बाजारातील परिस्थितीचा अंदाज आल्याने नेपाळच्या काही व्यापाऱ्यांनी भारतात मालाची विक्री सुरु केली आहे.

रोज 5 टन टोमॅटोची निर्यात भारतात टोमॅटोची मागणी वाढताच नेपाळमधून रोज 5 टन टोमॅटोची निर्यात करण्यात येत आहे. नेपाळमध्ये यावेळी टोमॅटोचे उत्पन्न जास्त आहे. तसेच फुलकोबी आणि पालक यांचे उत्पन्न पण जास्त आहे. त्यामुळे उत्तर भारताला आता नेपाळच भाजीपाला पुरविणार असेच सध्याचे चित्र आहे.

नेपाळचा मोठा फायदा नेपाळ सरकारने गेल्या काही वर्षांपासून कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी प्रत्येक गावात शेतकरी मित्र व्हॉट्सअप ग्रूप तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रत्येक गावात बी-बियाणे, खते, कीटकनाशकं, द्रव्य, नैसर्गिक शेतीसंबंधीची सामुग्री गावा-गावात पोहचविण्यात येत आहे. तसेच उत्पादन इतर देशांमध्ये विक्री करण्यासाठीचे काय निकष आहेत, याविषयीचे प्रशिक्षण, शिबिर घेण्यात येत आहेत. त्याचा नेपाळला यंदा चांगलाच फायदा झाला.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.