AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato Price : संधीचं सोनं! या देशाकडून स्वस्तात टोमॅटोची खरेदी, भारतात मोठी कमाई

Tomato Price : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 120 रुपये ते 160 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. काही भागात तर चांगल्या टोमॅटोला यापेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. त्याचाच फायदा भारतातील काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर शेजारील देशाची अशी चांदी होत आहे.

Tomato Price : संधीचं सोनं! या देशाकडून स्वस्तात टोमॅटोची खरेदी, भारतात मोठी कमाई
| Updated on: Jul 13, 2023 | 2:37 PM
Share

नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 120 रुपये ते 160 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. काही भागात तर चांगल्या टोमॅटोला यापेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. हा दर 200 रुपयांपेक्षा अधिक आहे. काही व्यापाऱ्यांनी या संधीचं सोनं केलं आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहारमधील काही व्यापाऱ्यांनी त्यावर चांगला पर्याय शोधला आहे. स्वस्तात टोमॅटो खरेदी करुन ते उत्तर भारतात महागड्या दराने त्याची विक्री करत आहे. टोमॅटोच्या बाजारातील अभावाचा फायदा भारतातील काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर शेजारील देशाची अशी चांदी होत आहे.

असा केला जुगाड गेल्या महिनाभरापासून देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी टोमॅटो शंभर तर कुठे दोनेशेच्या घरात मिळत आहे. याचा काही व्यापाऱ्यांनी फायदा उचलला आहे. त्यांनी नेपाळमधून स्वस्तात टोमॅटोची खरेदी करुन त्याची विक्री उत्तर भारतात सुरु केली आहे. नेपाळची सीमा जवळ असल्याने भारतीय व्यापारी या ठिकाणी जाऊन स्वस्तात टोमॅटोची खरेदी करत आहेत. टोमॅटोच नाही तर इतर भाजीपाला पण स्वस्त असल्याने त्याचा फायदा होत आहे.

किंमती अगदी स्वस्त सीमाभागात, धारचूला, बनबसा येथील लोक आणि आजूबाजूचे व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी नेपाळमध्ये जात आहेत. या ठिकाणी किंमती अगदी स्वस्त आहेत. नेपाळमध्ये काही ठिकाणी टोमॅटो 25 ते 30 रुपये किलो तर काही ठिकाणी 100 रुपये ते 110 रुपये नेपाळी रुपये म्हणजे 62 ते 69 भारतीय रुपये अशा भावाने मिळत आहेत. भारतात हेच टोमॅटो दुप्पट किंमतीला विक्री करुन डबल नफा कमावल्या जात आहे.

नेपाळमध्ये जोरदार उत्पादन उत्तर भारतात मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पण नेपाळमध्ये सुरुवातीचा पाऊस जोरदार झाल्याने पिकांचे चांगले उत्पन्न झाले आहे. भारतीय बाजारातील परिस्थितीचा अंदाज आल्याने नेपाळच्या काही व्यापाऱ्यांनी भारतात मालाची विक्री सुरु केली आहे.

रोज 5 टन टोमॅटोची निर्यात भारतात टोमॅटोची मागणी वाढताच नेपाळमधून रोज 5 टन टोमॅटोची निर्यात करण्यात येत आहे. नेपाळमध्ये यावेळी टोमॅटोचे उत्पन्न जास्त आहे. तसेच फुलकोबी आणि पालक यांचे उत्पन्न पण जास्त आहे. त्यामुळे उत्तर भारताला आता नेपाळच भाजीपाला पुरविणार असेच सध्याचे चित्र आहे.

नेपाळचा मोठा फायदा नेपाळ सरकारने गेल्या काही वर्षांपासून कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी प्रत्येक गावात शेतकरी मित्र व्हॉट्सअप ग्रूप तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रत्येक गावात बी-बियाणे, खते, कीटकनाशकं, द्रव्य, नैसर्गिक शेतीसंबंधीची सामुग्री गावा-गावात पोहचविण्यात येत आहे. तसेच उत्पादन इतर देशांमध्ये विक्री करण्यासाठीचे काय निकष आहेत, याविषयीचे प्रशिक्षण, शिबिर घेण्यात येत आहेत. त्याचा नेपाळला यंदा चांगलाच फायदा झाला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.