Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Canada Issue | कॅनडा फुल बॅकफूटवर, मोदी सरकारच्या स्ट्राइकने ट्रूडो सरकार जमिनीवर

India vs Canada Issue | कॅनडाला आता कळलं भारतासोबतच्या संबंधांच महत्त्व. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्टपणे कळून आलं. हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन हा तणाव निर्माण झालाय.

India vs Canada Issue | कॅनडा फुल बॅकफूटवर, मोदी सरकारच्या स्ट्राइकने ट्रूडो सरकार जमिनीवर
justin trudeau-PM Modi
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली : भारत सरकारच्या कठोर भूमिकेनंतर कॅनडाने गुडघे टेकले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडामध्ये हत्या झाली होती. त्यावरुन जस्टिन ट्रूडो सरकारने भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. भारताचा या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे भारत-कॅनडामधील संबंध प्रचंड ताणले गेले. भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा बंदी केली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. त्यांना देश सोडण्याचा आदेश दिला. भारत-कॅनडामधील व्यापारी संबंधांवर या तणावाचा परिणाम होणार आहे. भारतातील काही उद्योजकांनी कॅनडामधील गुंतवणूक काढून घेतली. भारत सरकारने एकाचवेळी अनेक आघाड्यांवरुन हल्लाबोल केला. त्यामुळे कॅनडा सरकार चांगलच जेरीस आलय.

कॅनडातील जस्टिन ट्रूडो सरकार आता पूर्णपणे बॅकफूटवर आहे. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले आहेत. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्टपणे कळून आलं. भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. “भारताशिवाय इंडो-पॅसिफिकची रणनिती अपूर्ण आहे. कारण भारतामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मजबुती मिळते. निज्जरच्या हत्येचा तपास सुरु राहील. पण त्याचवेळी इंडो-पॅसिफिक रणनीती करारावर काम सुरु राहील. भारतासोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. पण कायद्याच आणि आपल्या नागरिकांच रक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे” असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. इंडो-पॅसिफिक रणनीती आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असं ब्लेयर यांनी सांगितलं. उलट भारतावरच आरोप

कॅनडामध्ये खलिस्तानची मागणी करणाऱ्यांना बळ दिलं जातं. तिथल्या भूमीवरुन भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालतात. कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे. या खलिस्तान स्रमर्थकांवर कारवाई करावी अशी भारत सरकारची मागणी आहे. पण कॅनडातील सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी उलट भारतावरच आरोप करतय.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.