AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समता, सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा आरंभ, जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन!

केंद्र सरकारने नुकतेच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल रोजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.

समता, सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा आरंभ, जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन!
dharmendra pradhan
| Updated on: Apr 30, 2025 | 7:14 PM
Share

Caste Census Decision : केंद्र सरकारने नुकतेच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल रोजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. केंद्रीय शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले असून सबका साथ सबका विकास यासोबतच सामाजिक न्यायच्या भूमिकेलाही या निर्णयामुळे सशक्ती मिळाली आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान नेमकं काय म्हणाले?

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाष्य केलंय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारने जनगणनेत जातीनिहाय जनगणनेचा समावेश करण्याचं ठरवलं आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं मी स्वागत करतो. वंचित, मागास यांनी नीती ठरवताना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी, समाजातील सर्वच स्तरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी, सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक असमानतेला पारदर्शी तसेच प्रामाणिक पद्धतीने दूर करण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. सर्वच वर्गातील अधिकार सुनिश्चित करण्यासाठीही हे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे,’ असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून…

तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून एक यशस्वी सरकार चालवत आहेत. मोदी संविधानाच्या मूळ भावनेला अनुसरून सर्वांची साथ-सर्वांचा विकास या संकल्पासोबत सरकार सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक सरकार चालवत आहेत,’ असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

धर्मेंद्र प्रधान यांची काँग्रेसवर टीका

त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना काँग्रेस तसेच विरोधकांवर टीकाही केली. ‘काँग्रेस तसेच विरोधी पक्षांनी जातीनिहाय जनगणनेच्या विषयावर लोकांची नेहमीच फसवणूक केलेली आहे. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा या विषयाला फक्त कास्ट सर्वेपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले. जातिनिहाय जनगणनेला कधीही जनगणनेचा भाग करण्यात आले नाही,’ अशी टीका त्यांनी केली. तसेच मात्र मोदी यांची नीती ही स्पष्ट आणि दूरदर्शी निर्णय घेणारी आहे. इतिहासात झालेल्या चुका सुधरणारा केंद्र सरकारचा हा निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच हे शक्य झाले,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.