AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2022 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली :  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा देखील अशाच एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांचे देखील अपघाती निधन झाल्याने सरकारने रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार आता चारचाकीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली आहे.

काय आहेत नवे नियम?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकार रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबतच अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते बदल देखील करण्यात येणार आहेत.

वाहन कंपन्यांची दुटप्पी भूमिका

पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटलं आहे की, अनेकदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. जेव्हा या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्यामध्ये सहा एअरबॅग असतात. मात्र जेव्हा हेच उत्पादन देशात विक्रीसाठी तयार केले जाते तेव्हा वाहनामध्ये चारच एअरबॅग असतात.

वाहन कंपन्यांकडून चुकीचा दावा

याबाबत जेव्हा कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी खर्च वाढत असल्याचे कारण सांगितले, पण मला वाटत हा कंपन्यांचा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 900 रुपये इतकाच खर्च येतो. त्यामुळेच आता प्रत्येक चारचाकी वाहनात सहा एअरबॅगची सक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.