कोलकातामध्ये अग्नितांडव, हॉटेलच्या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू
ही आग नेमकी कशामुळे लागली, नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका हॉटेलला रात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. कोलकातामध्ये मंगळवारी रात्री मेचुआपट्टी भागातील श्रतुराज हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या आगीत १४ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर काही जणांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या इमारतीतून उड्या घेतल्या. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
कोलकाताचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्रतुराज हॉटेलमध्ये रात्री ८.१५ वाजता आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हॉटेलमध्ये अडकलेल्या अनेकांना बचाव पथकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. या आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आले आले. मात्र तरीही मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे. यासाठी एका विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.”
West Bengal | Manoj Kumar Verma, Kolkata Police Commissioner, says, “This fire incident took place at around 8:15 p.m. 14 bodies have been recovered, and several people have been rescued by the teams. The fire is under control, and rescue is underway. Further investigation is… https://t.co/bdOyqIYE9I pic.twitter.com/gujWPSnW7l
— ANI (@ANI) April 29, 2025
हॉटेलमध्ये आग लागल्याची बातमी मिळताच कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम आणि मंत्री शशि पंजा हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेनंतर हॉटेल मालक फरार झाला आहे. या आगीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजूमदार यांनी राज्य सरकारकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
West Bengal | Manoj Kumar Verma, Kolkata Police Commissioner, says, “This fire incident took place at around 8:15 p.m. 14 bodies have been recovered, and several people have been rescued by the teams. The fire is under control, and rescue is underway. Further investigation is… https://t.co/bdOyqIYE9I pic.twitter.com/gujWPSnW7l
— ANI (@ANI) April 29, 2025
काँग्रेसची टीका
पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सुभंकर सरकार यांनी या घटनेवरून कोलकाता महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे ‘ही घटना अत्यंत दुःखद आहे. अनेक लोक अजूनही इमारतीत अडकले आहेत. या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. महानगरपालिका काय करत आहे, हे मला समजत नाही.’ असा घणाघात सुभंकर सरकार यांनी केला.
