AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सीमाप्रश्न पेटवला गेला ते अत्यंत चुकीचं”; काँग्रेस नेत्याचा भाजपवर घणाघात

ज्या पद्धतीने सीमावाद ज्या पद्धतीने पेटवला गेला ते मात्र अत्यंत चुकीचं असल्याचे परखड मत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मांडले

सीमाप्रश्न पेटवला गेला ते अत्यंत चुकीचं; काँग्रेस नेत्याचा भाजपवर घणाघात
| Updated on: Dec 09, 2022 | 6:46 PM
Share

मुंबईः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर सीमावादाची नव्याने ठिणगी पडली. त्यानंतर दोन्ही राज्यातून असंतोष व्यक्त करण्यात येऊ लागला. वाद वाढल्याने सीमावादात केंद्रानं हस्तक्षेप करावा अशीही मागणी करण्यात येऊ लागली. हा वाद आणखी पेटू लागल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राज्यातून जोरदार टीका होऊ लागली. त्यात आता काँग्रेसनेही उडी घेत भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नावर बोलताना त्यांनी थेट भाजपवर टीका केली आहे. यावर बोलताना म्हणाले की, महारष्ट्रातील खासदारांनी यापूर्वीच केंद्राकडे भेटण्यासाठी वेळ मागितली होती.

मात्र ज्या पद्धतीने सीमावाद ज्या पद्धतीने पेटवला गेला ते मात्र अत्यंत चुकीचं असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.

तर कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने या प्रकरणावर ज्या प्रकारे बोलत आहेत, तेही चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक या वादावर बोलताना काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्याकडून नेहमी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.

त्यामुळे बोमई हे त्यांच्याच पक्षात आहेत. त्यामुळे त्यांना समजून सांगणं आणि मध्यस्थी करणं गरजेचं असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेत असंतोष पसरत आहे.

त्याचवेळी बाळासाहेब थोरात यांनी गुजरात निवडणुकीविषयीही सांगितले. यावेळी गुजरात निवडणुकीचे विश्लेषण करताना म्हणाले की, भाजपच्या विजयात आपचा वाटा मोठा आहे.

त्यांचा फटका काँग्रेसला बसला आहे. विरोधी पक्ष म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे पण ते समजून घेणंही गरजेचं असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईडीच्या कारवाईवर बोलताना त्यांनी भाजपची पोलखोलही केली. ईडीकडून नेत्यांवर केली गेलेली कारवाईबाबत सांगितले की, लहान मुलांना जरी विचारलं तरी ईडीचं राजकारण त्यांच्या लक्षात आले आहे, ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे.

भाजप मंत्री आणि पदाधिकारी यांचं वागणं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. संजय राउताना भाजपचे लोक पुन्हा आत घालायला निघाले आहेत का.? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.