AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला – दिल्ली पोलिस

दिल्ली पोलिस महासंचालकांनी शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केला पण आम्ही संयम बाळगला, असं पोलिस महासंचालक एस. एन. श्रीवास्तव त्यांनी म्हटलंय.

Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला - दिल्ली पोलिस
| Updated on: Jan 27, 2021 | 9:07 PM
Share

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर आज दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दिल्ली पोलिस महासंचालकांनी शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केला पण आम्ही संयम बाळगला, असं पोलिस महासंचालक एस. एन. श्रीवास्तव त्यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिस कारवाईचीही माहिती दिली. त्याचबरोबर किती पोलिस कर्मचारी जखमी झाले याची आकडेवारीही सांगितली आहे.(Delhi Police made serious allegations against the farmer leaders)

‘दिल्लीतील हिंसाचारात 394 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकरी नेते आंदोलकांना भरीस घालत होते. त्यांनीच ठरवून दिलेल्या मार्गावरुन ट्रॅक्टर रॅली काढण्यास विरोध केला. शेतकरी नेते आंदोलकांना कशाप्रकारे भरीस घालत आहेत याचे व्हिडीओ पोलिसांकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं. गाजीपूरमध्ये राकेश टिकैत यांची टीम बॅरिकेट्स तोडून दिल्लीत घुसले. पोलिसांकडे अनेक पर्याय होते पण आम्ही संयम बाळगला. शेतकरी नेतेही हिंसाचारात सहभागी होते,’ असा गंभीर आरोप पोलिस महासंचालकांनी केलाय. हिंसाचारात पोलिसांच्या 30 गाड्यांचं नुकसान झालं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचं श्रीवास्तव म्हणाले.

‘शेतकरी नेते दोषी आढळल्यास सोडलं जाणार नाही’

कोणताही शेतकरी नेता दोषी आढळल्यास त्यांना सोडलं जाणार नाही. पोलिसांनी आतापर्यंत 25 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आमच्याकडे आहेत. आम्ही चेहरा ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करु. आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आलंय, तर 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!

दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेनंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि भारतीय किसान यूनियनने (भानू) आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इथून पुढे ही संघटना या आंदोलनात राहणार नाही. अशा प्रकारे आंदोलन चालत नसतं. इथं कुणाला मार खाण्यासाठी किंवा शहीद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत सरकारसोबत चर्चेला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. टिकैत सरकारसोबत चर्चेला गेले पण त्यांनी तिथे उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला का? त्यांनी धान खरेदीबाबतचे प्रश्न या बैठकीत मांडलेत का? आम्ही केवळ पाठिंबा देतो आणि काही लोक नेते बनत आहेत. हे आपलं काम नाही. हिंसेशी आमचं काहीही घेणंदेणं नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

शेतकरी आंदोलनात फूट?; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!

दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल

Delhi Police made serious allegations against the farmer leaders

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.