AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Violence : ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर शेतकरी नेते बॅकफुटवर, 1 फेब्रुवारीचा ‘संसद मार्च’ स्थगित

शेतकरी संघटनांनी 1 फ्रेबुवारीला होणारा संसद मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी बुधवारी सिंधू बॉर्डरवर पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे.

Delhi Violence : ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर शेतकरी नेते बॅकफुटवर, 1 फेब्रुवारीचा 'संसद मार्च' स्थगित
| Updated on: Jan 27, 2021 | 9:55 PM
Share

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताक दिनी पुकारलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे शेतकरी नेते आता काहीसं बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शेतकरी संघटनांनी 1 फ्रेबुवारीला होणारा संसद मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी बुधवारी सिंधू बॉर्डरवर पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. आंदोलनाचा पुढील कार्यक्रम लवकरच ठरवला जाईल असंही राजेवाल यांनी सांगितलं आहे.(Parliamentry march of farmers organization was postpone after delhi violence)

राजेवाल यांनी संसद मार्च स्थगित केल्याची घोषणा करतानाच शेतकरी आंदोलन तोडण्यासाठी सरकार कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर परेडसाठी 2 लाख ट्रॅक्टर आले आणि सर्व जगाची नजय या रॅलीवर होती. मात्र सरकारनं कट रचून पंजाब किसान मजदूर समितीला परेडमध्ये पुढे आणून ठेवलं. त्यांच्यासोबत सरकारचे लागेबांधे होते. आमच्यासाठी प्रत्येक मार्गावर अडथळा निर्माण केला गेला. पंजाब किसान मजदूर समितीच्या लोकांना स्वत: सरकारनेच लाल किल्ला आणि आयटीओवर पाठवलं. दीप सिद्धू सरकारचा खास माणूस आहे. 26 जानेवारीला सर्व पोलिस आपल्या पोलीस चौक्या सोडून गेले आणि त्यांना हिंसा करु दिली, असा आरोप राजेवाल यांनी केला आहे. दरम्यान, आमची काही चूक नसतानाही आम्ही देशवासियांची माफी मागतो. हे शेतकरी आंदोलन सुरुच राहील, असा दावाही त्यांनी केलाय.

३० जानेवारीला देशभरात जनसभा

30 जानेवारीला विविध शेतकरी संघटनांकडून देशभरात जनसभा केल्या जातील. एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाईल. मात्र 1 फेब्रुवारीला आयोजित संसद मार्च स्थगित करण्यात आला आहे. तो पुढे कधी होईल याची तारीख निश्चित केली जाईल, असंही राजेवाल यांनी सांगितलं आहे.

दीप सिद्धूवर सामाजिक बहिष्कार टाका – योगेंद्र यादव

प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेली ट्रॅक्टर परेड यशस्वी ठरली. त्यात काही घटना या ठरल्याप्रमाणे झाल्या नाहीत. आम्ही त्या घटनांपासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. दीप सिद्धू आणि पंजाब किसान मजदूर समितीच्या कारनामे आम्ही सर्वांसमोर आणले आहेत. ये सरकारने सुनियोजित व्यक्ती होते. आम्ही संपूर्ण देशाला दीप सिद्धूवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत आहोत, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला – दिल्ली पोलिस

Parliamentry march of farmers organization was postpone after delhi violence

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.