AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीश कुमारांच्या डोकेदुखीत वाढ; तिकीट कापलेले भाजप नेते पासवानांच्या पक्षात

लवकरच लोजपकडून ७० उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये भाजपमधून आलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

नितीश कुमारांच्या डोकेदुखीत वाढ; तिकीट कापलेले भाजप नेते पासवानांच्या पक्षात
| Updated on: Oct 08, 2020 | 2:13 PM
Share

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि संयुक्त जनता दलाकडून JD(U) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्यानंतर आता नितीश कुमार यांच्यासमोर नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे. कारण, भाजप-जदयू यांच्यात युती झाल्यामुळे उमेदवारी कापली गेलेले भाजप नेते वेगाने लोक जनशक्ती पक्षात (लोजप) दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या १० बड्या नेत्यांनी लोजपमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये दोन विद्यमान आमदारांचा समावेश आहे. (Bihar Assembly Election 2020)

भाजप-जदयू यांच्यात युती झाल्यानंतर या दोन्ही आमदारांचे मतदारसंघ जदयूच्या वाट्याला आले. त्यामुळे या भाजप नेत्यांनी ‘लोजप’मध्ये प्रवेश करून नितीश कुमार यांच्याविरोधात शड्डू ठोकायचे ठरवले आहे.

नितीश कुमार यांचे नेतृत्त्व मान्य नसल्यामुळे ‘लोजप’चे अध्यक्ष चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडले होते. मात्र, पासवान यांनी केंद्रातील भाजपसोबतची युती कायम ठेवली आहे. ‘लोजप’कडून केवळ ‘जदयू’विरोधात उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार आहेत. लवकरच लोजपकडून ७० उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये भाजपमधून आलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

पालीगंज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार उषा विद्यार्थी बुधवारीच लोजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, राजेंद्र सिंह आणि रामेश्वर चौरासिया यांनीही निवडणूक लढवण्यासाठी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. या तिन्ही नेत्यांना अनुक्रमे पालीगंज, दिनारा आणि सासाराम मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने या तिन्ही नेत्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिघांनीही पक्षाचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आता नितीश कुमार यांच्या ‘जदयू’समोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर या तीन तारखांना मतदान होईल. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

संबंधित बातम्या:

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची फौज सज्ज, शरद पवारांसह स्टार प्रचारकांची यादी जाहीर

बिहारमध्येही महाविकास आघाडीसारखंच चित्र शक्य, कट्टर विरोधक एकत्र येणार?

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी

दिग्विजय सिंहांच्या मुलीला भाजपचं तिकीट, बिहार निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

(Bihar Assembly Election 2020)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.