AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : सर्वसाधारण मते नोंदवू नका; सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टांना सल्ला

दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेबाबत काही निरीक्षणे नोंदवली होती. त्याचा इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाची निरीक्षणे आजच्या सुनावणीदरम्यान हटवली. याचवेळी देशभरातील उच्च न्यायालयांना डोस पाजला.

Supreme Court : सर्वसाधारण मते नोंदवू नका; सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टांना सल्ला
सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण
| Updated on: Feb 18, 2022 | 12:37 AM
Share

नवी दिल्ली : उच्च न्यायालयांकडून विविध खटल्यांत सर्वसाधारण मते नोंदवली जातात. त्या निरीक्षणांचा इतर खटल्यांच्या सुनावणीदरम्यान संदर्भ दिला जातो. त्याचा अनेक खटल्यांच्या निकालांवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) ने देशभरातील सर्वच उच्च न्यायालयां (High Court) ना निरीक्षणे नोंदवताना खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. उच्च न्यायालयांनी त्यांच्यापुढे दाखल झालेल्या खटल्यापुरताच बोलावे, खटल्याशी संबंध नसलेली इतर सर्वसाधारण मते व्यक्त करू नयेत, अशा प्रकारची सर्वसाधारण मते टाळावीत, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने आव्हान दिले आहे. सरकारच्या अपिलावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने उच्च न्यायालयांना मते नोंदवताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. (Do not record general opinions; Supreme Court advises High Courts)

दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेबाबत काही निरीक्षणे नोंदवली होती. त्याचा इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाची निरीक्षणे आजच्या सुनावणीदरम्यान हटवली. याचवेळी देशभरातील उच्च न्यायालयांना डोस पाजला.

याचिकाकर्त्या कंपनीचा केंद्र सरकारवर पक्षपातीपणाचा दावा

केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत कंत्राटे देताना निविदा प्रक्रियेतील हिंदुस्थानी कंपन्यांवर अन्याय केला, असा आरोप करीत भारत फ्रित्झ वेर्नेर कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर याचिकाकर्त्या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपले म्हणणे मांडण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली होती. याचवेळी काही सर्वसाधारण मतेही नोंदवली होती. त्यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने सर्वच उच्च न्यायालयांना खटल्यापुरताच बोलण्याचा आणि सर्वसाधारण टिप्पणी टाळण्याचा सल्ला दिला आहे. (Do not record general opinions; Supreme Court advises High Courts)

इतर बातम्या

लग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! बुलडाण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला

Video : ज्वेलर्स दुकानातून अज्ञात महिलेने सोन्याचे मंगळसूत्र लांबविले, शहर पोलीसात गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.