AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूरदर्शनला अच्छे दिन, रामायण-महाभारत कार्यक्रमामुळे देशात दूरदर्शन पहिल्या स्थानावर

भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणारा चॅनेलच्या यादीत दूरदर्शन चॅनेलने पहिलं स्थान (Doordarshan number one in india) मिळवलं आहे.

दूरदर्शनला अच्छे दिन, रामायण-महाभारत कार्यक्रमामुळे देशात दूरदर्शन पहिल्या स्थानावर
| Edited By: | Updated on: Apr 12, 2020 | 5:09 PM
Share

नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणारा चॅनेलच्या यादीत दूरदर्शन चॅनेलने पहिलं स्थान (Doordarshan number one in india) मिळवलं आहे. रामायण आणि महाभारत या दोन प्रसिद्ध कार्यक्रमामुळे दूरदर्शनच्या व्ह्युअरशिपमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या चॅनेलने पहिलं स्थान मिळवलं आहे. या दोन्ही कार्यक्रमांनी सर्वाधिक प्रेक्षक वर्ग आपल्याकडे खेचून घेण्यात (Doordarshan number one in india) यश मिळवलं.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलकडून (BARC) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात रामायण आणि महाभारत कार्यक्रमामुळे संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेत दूरदर्शन चॅनेलच्या व्युअरशिपमध्ये 40 हजाराने वाढ झाली आहे.

लॉकडाऊनमुळे महाभारत आणि रामायण कार्यक्रमाचे प्रसारण करण्याचा निर्णय

देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे टेलिव्हिजन शो आणि चित्रपटाचे प्रोडक्शन बंद करण्यात आलं आहे. अशामध्ये सरकारकडून दूरदर्शनवर रामायण, महाभारत, शक्तिमान आणि बुनियादसारखे जुने प्रसिद्ध कार्यक्रम पुन्हा चॅनेलवर प्रसारित करण्यात आले आहे. दरम्यान, यामधील सर्वाधिक कार्यक्रम अशावेळी प्रसारित केले होते. ज्यावेळी देशात टीव्ही ब्रॉडकास्टिंगमध्ये दूरदर्शन एकमेव चॅनेल होता.

“एका आठवड्यात दूरदर्शनची व्ह्युअरशिप 650 टक्क्यांनी वाढली आहे. 12 व्या आठवड्यात चॅनेलची व्ह्युअरशिप 267 मिलियनेपेक्षा अधिक होती. तर 13 व्या आठवड्यात 2109 मिलियन पेक्षा अधिक झाली आहे”, असा दावा दूरदर्शनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. विशेष म्हणजे दूरदर्शनची सर्वाधिक व्ह्युअरशिपही ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून अधिक आहे.

रामानंद सागर यांच्या रामायण कार्यक्रमाचे सर्वात पहिले प्रसारण 1987 मध्ये झाले होते. त्यावेळी लोकांमध्ये या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात क्रेझ होती. विशेष म्हणजे हा कार्यक्रम जेव्हा दूरदर्शनवर दाखवला जायचा त्यावेळेस रस्त्यांवर शुकशुकाट आणि ट्रेनही एक तास थांबवली जात होती. लोकं एकत्र मिळून हा कार्यक्रम बघत होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.