AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi On Election : 2024ची निवडणूक शेवटची?, देशात निवडणुका होतील की नाही?; मोदींनी बेधडक काय सांगितलं?

देशात हुकुमशाही येणार असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. प्रत्येक सभेत, प्रचार रॅलीत यावर भर देण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत पंतप्रधानांनी अशी काढली या आरोपातील हवा...

PM Modi On Election : 2024ची निवडणूक शेवटची?, देशात निवडणुका होतील की नाही?; मोदींनी बेधडक काय सांगितलं?
विरोधकांच्या आरोपांवर पलटवार
| Updated on: May 02, 2024 | 9:32 PM
Share

देशात लवकरच हुकुमशाही येणार असल्याचा प्रचार विरोधकांकडून करण्यात येत आहे. देशातील लोकशाही भाजपमुळे धोक्यात आल्याचा आरोप विरोधी खेम्यातून वारंवार करण्यात येत आहे. संविधान पण बदलण्याचा डावा असल्याचा विरोधकांचा दावा आहे. देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या दाव्यातील अशी हवा काढली.

 हुकूमशाह कधीच जन्माला येणार नाही

२०१४मध्येही असंच म्हटलं गेलंय. ही निवडणूक शेवटची आहे. २०१९मध्येही म्हटलंय की ही निवडणूक शेवटची आहे. आता २०२४मध्येही तेच म्हणत आहेत. याचा अर्थ विरोधकांची बँकरप्सी आहे. त्यांच्याकडे कोणताही नवा मुद्दा नाही. जी गोष्ट होणार नाही. होणार नाही, संभावना नाही, त्यावर काय बोलायचं. या देशात एवढा मोठं संविधान आहे, देशात ९०० टीव्ही चॅनल्स चालतात तिथे हुकूमशाह जन्मालाच येऊ शकत नाही. ढगातून येऊनही निर्माण होऊ शकत नाही. ज्या देशात न्यायालय एवढं व्हायब्रंट आहे, तिथे हुकूमशाह कधीच निर्माण होऊ शकत नाही. तो जमाना गेला. १९७५मध्ये देशाने एक संकट झेललं. पुन्हा ते संकट येणार नाही, असा खरपूस समाचार मोदींनी घेतला.

खरंच संविधान बदलणार का?

पहिली गोष्ट म्हणजे, आज आपल्याकडे किती जागा आहे. आजही एनडीएकडे सुमारे ३६० जागा आहेत, आणि एनडीएच्या व्यतिरिक्त म्हणजे बीजेडी एनडीएत नाही. पण त्यांच्या जागाही गृहित धरल्यास आम्ही ४००च्या पुढे आहोत. गेल्या पाच वर्षापासून आम्ही ४०० जागा घेऊन बसलो आहोत. जर असं पाप कुणाला करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. हा तर्क नाही, सत्यही नाही, असे मोदी म्हणाले.

नेहरुंवर पुन्हा टीका

पण हे का केलं जातंय, कारण त्यांच्याकडे त्यांचा इतिहास पाहा.  जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या संविधानाचे पावित्र्य मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? काँग्रेस पक्षाच्या संविधानाला नष्ट करण्याचं काम या कुटुंबाने केलं आहे. त्यांनी संविधानाच्या मर्यादा तोडल्या. काँग्रेसने अधिकृतरित्या संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवलं होतं. अधिकृतरित्या. त्यानंतर त्यांच्या पाठीत सुरा खूपसून त्यांना पराभूत केलं. गेनचा खेळ आहे. त्यांनी संविधानासोबत नेहमी छेडछाड केली. नेहरू, एवढे मोठे लोकशाहीचे चेहरा म्हणता ना… संसदेत त्यांनी सर्वात आधी संविधानात दुरुस्ती केली ती फ्रिडम ऑफ स्पीचवर रिस्ट्रिक्शन आणणारं. पूर्णपण अलोकशाहीवादी नेहरूंनी केलं होतं, अशी टीका मोदींनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.