AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’, राजभवन आणि LG ना घेराव घालणार

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते आज दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीनं आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका नेत्यानं दिली आहे.

Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात 'शेतकरी अधिकार दिवस', राजभवन आणि LG ना घेराव घालणार
| Updated on: Jan 15, 2021 | 9:25 AM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 50 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीतही शेतकरी दिल्लीच्या रस्त्यांवर ठाण मांडून आहेत. अशा स्थितीत आज काँग्रेसकडून देशभरात शेतकरी आधिकार दिवस म्हणून पाळणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांनी सर्व प्रदेश काँग्रेसला राजभवन आणि केंद्र शासित प्रदेशातील एलजीच्या घरांना घेराव घालण्यास सांगितलं आहे.(Congress will cordon off Raj Bhavan and LG residences across the country today)

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते आज दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीनं आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका नेत्यानं दिली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चंदगी राम आखाडा इथं एकत्र जमण्यास सांगण्यात आलं आहे. तिथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नायब राज्यपालांच्या निवासस्थानी पायी मोर्चा काढला जाणार आहे.

‘केंद्राला कृषी कायदे परत घ्यावेच लागतील’

‘कृषी कायद्यामुळे देशातील मुठभर लोकांना फायदा होणार आहे आणि त्याची किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागणार आहे,’ अशी टीका राहुल गांधी यांनी गुरुवारी केलीय. केंद्र सरकारला हे कृषी कायदे परत घावेच लागतील, असा दावाही त्यांनी केलाय. कृषी कायद्यावरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांची फक्त उपेक्षाच करत नाही, तर शेतकऱ्यांना नष्ट करण्याची एक योजना आखत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकार आपल्या 2-3 मित्रांचा फायदा करु इच्छित आहे आणि तेच सध्या घडत असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची 9वी फेरी

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसनं यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वी 24 डिसेंबरला काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. दरम्यान, केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा आज 51वा दिवस आहे. आज दुपारी 12 वाजता कृषी मंत्रालयात केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेची ही 9वी फेरी आहे.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठीच्या समितीतून भूपेंद्रसिंग मान बाहेर

सुप्रीम कोर्टाची कृषी कायद्यांना स्थगिती, चार सदस्यीय समितीवर शरद पवारांचे मत काय?

Congress will cordon off Raj Bhavan and LG residences across the country today

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.