AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, प्रवीण तोगडिया यांची मागणी

शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया (Praveen Togadia) यांनी केली आहे.

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, प्रवीण तोगडिया यांची मागणी
बाळासाहेब ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 3:42 PM

दिल्लीः शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया (Praveen Togadia) यांनी केली आहे. तोगडिया यांनी यापूर्वीही ही मागणी केली होती. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवसैनिक सहभागी

ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली. यात हजारो भाजप आणि हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते सहभागी झाले. शिवसेनेचेही अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत 16 व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभर दंगली उसळल्या. त्यात जवळपास दोन हजार लोक मारले गेले. हा इतिहास सर्वांना माहितच आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

यापूर्वीही केली होती मागणी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्वादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. राम मंदिर आंदोलनाला त्यांनी नेतृत्व केल्याचे यापूर्वीही तोगडिया यांनी म्हटले आहे. राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी यापूर्वी तोगडिया यांनी केली होती.

संघ परिवाराशी बिनसले

प्रवीण तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे नेते होते. मात्र, त्यांचे संघ परिवारातील काही नेत्यांसोबत मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांची विश्व हिंदू परिषदेतून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली आहे. आता ते संधी मिळेल तेव्हा भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात.

भाजपवर कुरघोडी

सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात चांगलेच आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. दोघांमधील युती तुटून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी करून भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

इतर बातम्याः

Raj Thackeray | राज ठाकरेंचा नाशिक दौरा पुढे ढकलला; महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ पुण्यातून फुटणार, 15 डिसेंबरला MNS चा मेळावा

Sharad Pawar| एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, पवारांकडून झिरवळांचे कौतुक; सत्ता येते-जाते, फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.