AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. (how did chirag paswan's ljp playe role in pushing nitish kumar's jdu)

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले 'जाएंट किलर'!
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 8:19 PM

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. ऐनवेळी लोजपा नेते चिराग पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवल्याने त्याचा फटका भाजपऐवजी नितीशकुमार यांनाच सर्वाधिक बसल्याचं दिसत आहे. पासवान यांच्या हाती यश आलं नसलं तरी त्यांनी जेडीयूची मते खेचून राज्यात नंबर वन होण्याचं नितीशकुमार यांचं स्वप्न त्यांनी भंग केलं असून पासवान हे खऱ्या अर्थाने बिहारमध्ये जाएंट किलर ठरले आहेत. (how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

हाती आलेल्या कलानुसार भाजपने 73 तर राजदने 64 जागांवर आघाडी घेातली आहे. तर जेडीयूने 49 जागांवर आघाडी घेतली आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला अवघ्या एका जागेवर आघाडी घेता आली आहे. मात्र, लोजपाला 5.8 टक्के मते मिळविण्यात यश आलं आहे. भाजपला आतापर्यंत 19.8 टक्के आणि जेडीयूला 15.4 टक्के मते मिळाली आहे. तर, आरजेडीला 22.9 टक्के मते मिळाली आहेत. जर लोजपाने जेडीयूच्या विरोधात उमदेवार दिले नसते तर जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला असता, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

चिराग पासवान यांनी जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले. त्यामुळे महादलित मतांची विभागणी झाली. त्याचा सर्वाधिक फटका जेडीयूला बसला आहे. मागच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी महादलित हा नवा वर्ग केला होता. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला होता तर रामविलास पासवान यांना नुकसान झालं होतं. मात्र, पाच वर्षानंतर हे चित्रं उलटलं असल्याचं पाह्यला मिळत आहे. त्याशिवाय संपूर्ण निवडणुकीत चिराग यांनी आपण भाजपचे समर्थक असून निकालानंतर भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेही चिराग यांचा लोजपा भाजपची बी टीम असल्याचा मेसेज गेला होता. त्याचाही परिणाम पाह्याला मिळाला आहे. जाणकारांच्या मते, लोजपाच्या 6 टक्के मतांपैकी 3 टक्के मतेही एनडीएला मिळाली असती तर नितीशकुमार यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असताच शिवाय एनडीएचा सरकार बनविण्याचा मार्गही सोपा झाला असता.

या आठ जागा गमावल्या

महुआ विधानसभा मतदारसंघात लोजपा उमेदवाराने 12 हजार मते घेतल्याने तिथे जेडीयूचा पराभव झाला. मटिहानी येथे लोजपाने 26 हजार मते घेतल्याने जेडीयूच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली आहे. महिषीमध्ये लोजपाने 7 हजार, जहानाबादमध्ये लोजपाने 20 हजार, कुर्था येथे 8 हजार, नोखा येथे 11 हजार आणि सासाराममध्ये 12 हजार मते घेऊन जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव केला. दिनारामध्ये मात्र जेडीयूच्या उमेदवाराने 21 हजार मते घेतल्याने लोजपा उमेदवाराचा पराभव झाला. इथे लोजपाला 46 हजार तर आरजेडीच्या उमेदवाराला 50 हजार मते मिळाले होते.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु

माजी मुख्यमंत्र्यांकडून माजी विधानसभा अध्यक्षांचा पराभव, जीतन राम मांझी 16 हजार 717 मतांनी विजयी

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

(how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....