AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Crime : भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळली, बाप रडत रडत तिचा जळका पाय घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला !

ममता नेहमी वडिलांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत असे. तसेच आपल्याला इथून घेऊन जा असे म्हणायची. पण जेव्हा वडिल तिच्याकडे पोहचले तेव्हा ममताचा मृत्यू झाला आहे. ममताची हत्या करुन मृतदेह सोन नदीजवळ गाडण्यात आला. नंतर गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि जाळला.

Bihar Crime : भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळली, बाप रडत रडत तिचा जळका पाय घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला !
भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळलीImage Credit source: tv9
| Updated on: Jun 10, 2022 | 6:11 PM
Share

बिहार : एका विवाहितेचा छळ करत पती आणि सासऱ्याने तिची हत्या (Murder) करुन मृतदेह जाळल्या (Burnt)ची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. जेव्हा महिलेचे वडील तेथे पोहचले तेव्हा तिचा केवळ पायच बाकी होता. महिलेच्या वडिलांनी तिचा पाय घेऊन मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ममता असे मयत मुलीचे नाव आहे. लग्न झाल्यापासून सासरचे लोक ममताचा पैशासाठी छळ करत होते. दररोज तिला मारहाण (Beating) करत होते, असे ममताचे वडिल अखिलेश बिंद यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी ममताचा पती शत्रुघ्न बिंद आणि सासरा राम प्यारे बिंद यांच्या विरोधात हुंडा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

ममता हिचा विवाह बरौली गावातील शत्रुघ्न बिंद याच्यासोबत मे 2021 मध्ये झाला होता. लग्नानंतर सासरचे लोक तिला माहेरुन एक लाख रुपये आणण्यास सांगत होते. मात्र माहेरचे लोक पैसे देऊ शकत नव्हते. त्यामुळे सासरचे लोक तिला रोज मारहाण करायचे. अखेर पैशासाठी सासरच्यांनी तिची सोमवारी हत्या करुन मृतदेह जाळला. घटनेची माहिती मिळताच वडिलांनी धाव घेतली. मात्र ममताचा जळून मृत्यू झाला होता. तिचा केवळ एख पायच सहीसलामत होता. वडिलांनी एका पिशवीत तो पाय टाकला आणि पोलीस ठाणे गाठले. पायातील जोडवी आणि पैंजणावरुन अखिलेश यांनी ही आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. सध्या हा पाय डीएनए रिपोर्टसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

आधी मृतदेह गाडला मग बाहेर काढून जाळला

ममता नेहमी वडिलांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत असे. तसेच आपल्याला इथून घेऊन जा असे म्हणायची. पण जेव्हा वडिल तिच्याकडे पोहचले तेव्हा ममताचा मृत्यू झाला आहे. ममताची हत्या करुन मृतदेह सोन नदीजवळ गाडण्यात आला. नंतर गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि जाळला. यामध्ये महिलेचा पाय वाचला होता, असे भोजपूरच्या एएसपींनी सांगितले. हा पाय घेऊन वडिलांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. (In Bihar a married woman was killed for her dowry and her body was cremated)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.