AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियातील सर्वात उंच खांबावर फडकला भारताचा तिरंगा, रंगला बीटिंग द रिट्रीट सोहळा

2017 मध्ये भारताने अटारी येथे 360 फूट उंच तिरंगा बसवला होता. ध्वजाची लांबी 120 फूट आणि रुंदी 80 फूट होती. परंतु, जोरदार वाऱ्यामुळे हा तिरंगा तीन वेळा फाटला. तो दुरुस्त करून पुन्हा फडकवण्यात आला. मात्र, त्यावरून बराच वाद झाला होता.

आशियातील सर्वात उंच खांबावर फडकला भारताचा तिरंगा, रंगला बीटिंग द रिट्रीट सोहळा
wagha borderImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 26, 2024 | 5:03 PM
Share

पंजाब | 26 जानेवारी 2024 : भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पंजाब राज्यातील अटारी बाघा सीमेवरही सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी सकाळी तिरंगा फडकवण्याचा सोहळा पार पाडला. डीआयजी बॉर्डर रेंज संजय गौर यांचे जवानांनी रेड कार्पेटवर स्वागत केले. त्यांनी जवानांशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जवानांना मिठाई आणि फळांची टोपली दिली. यानंतर डीआयजी बॉर्डर रेंज संजय गौर यांनी आशियातील सर्वात उंच खांबावर भारताचा तिरंगा फडकवला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑक्टोंबर 2023 मध्ये अटारी सीमेवर जयंती गेटसमोर लावण्यात आलेल्या या ध्वजाचे उद्घाटन केले होते. 418 फूट उंच असा हा तिरंगा आहे. या ध्वजासाठी 305 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याआधी देशाचा सर्वोच्च ध्वज कर्नाटकात फडकत होता. कर्नाटकातील कोते केरे येथील बेळगावी 361 फूट उंचीचा सर्वात उंच तिरंगा ध्वज स्थापित केला आहे.

भारतीय ध्वजाने दिली पाकिस्तानी ध्वजाला टक्कर

2017 मध्ये भारताने अटारी येथे 360 फूट उंच तिरंगा बसवला होता. ध्वजाची लांबी 120 फूट आणि रुंदी 80 फूट होती. परंतु, जोरदार वाऱ्यामुळे हा तिरंगा तीन वेळा फाटला. तो दुरुस्त करून पुन्हा फडकवण्यात आला. मात्र, त्यावरून बराच वाद झाला होता. हा ध्वज पाहून पाकिस्तानने चीनच्या मदतीने आपल्या ध्वजाची उंची 400 फूट वाढवली. त्यात लिफ्ट आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते.

भारताचा हा 418 फुटी ध्वज हा NHAI सीमेच्या सुशोभीकरणाचे काम करत आहे. शिवाय जगभरातून पंजाबला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे. याच अटारी बाघा सीमेवर प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झाली. दोन्ही सीमेवरील जवानांनी एकमेकांचे अभिनंदन करून एकमेकांना मिठाई दिली.

पाकिस्तान रेंजर्स यांनी दिल्या शुभेच्छा

दुपारनंतर दोन्ही देशांच्या सीमाचे दरवाजे उघडतील. यावेळी दोन्ही देशांचे जवान आमनेसामने येतील. दोघांच्याही हातात मिठाई असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा आनंद असेल. पाकिस्तान रेंजर्स बीएसएफला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतील आणि मिठाईची देवाणघेवाण करतील. त्यानंतर संध्याकाळी येथे रिट्रीट सोहळा सुरू होईल. सायंकाळी होणाऱ्या या सोहळ्याला 35 हजारांहून अधिक पर्यटक येण्याची शक्यता आहे. या क्षणाची आठवण म्हणून या दिवशी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक सीमेवर पोहोचतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.