Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण मिळाले का? विश्व हिंदू परिषदेने दिले उत्तर

ram mandir pran pratishtha | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. यावरुन राज्यातील राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण दिले नसल्यावरुन संजय राऊत संतापले होते. आता यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण मिळाले का? विश्व हिंदू परिषदेने दिले उत्तर
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 9:57 AM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, दि.29 डिसेंबर | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. परंतु या सोहळ्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवले नसल्याचे आरोप होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अयोद्धेत राम मंदिरासाठी निमंत्रण पाठवणारे भाजप कोण? आम्ही भाजपचे हे पॉलिटीकल इव्हेंट संपल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊ, असे म्हटले. त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित दिले आहे.

कोणाला पाठवले निमंत्रण

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कामांचे वाटप केले गेले आहे. त्यानुसार रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेच्याकडे देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे, शरद पवार याशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी आम्ही सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित दिले आहे. कोणालाही टाळलेले नाही. सर्वांनी सोहळ्याला यावे. यात राजकारण करू नये, असे अलोक कुमार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले नसल्यामुळे भाजपवर जोरदार टीका केली होती. आम्ही राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दिले असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपचा हा पॉलिटीकल इव्हेंट संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ, असे त्यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले होते. राज ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. यावर गिरीश महाजन म्हणाले होती की, अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. उद्धव ठाकरे साधे आमदार आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. परंतु आता विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणावर पडदा पडणार आहे.

खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.