AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : लो मै आया… प्रतीक्षा संपली, मान्सून अंदमानात दाखल, देशभराच्या नजरा आता केरळकडे!

देशभरात उष्णतेची लाट असतानाच मान्सूनचे आगमन होणार ही मोठी दिलासादायक बाब आहे. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. राज्यात सर्वाधिक फटका नागपूर विभागाला बसला असून उष्मघाताने सर्वाधिक मूत्यू याच विभागात झाले आहेत. मात्र, मान्सून आता बंगालच्या उपसागरातून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा परिणाम दिसून आला आहे.

Monsoon : लो मै आया... प्रतीक्षा संपली, मान्सून अंदमानात दाखल, देशभराच्या नजरा आता केरळकडे!
पावसाची खबरबातImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2022 | 5:34 PM
Share

मुंबई : ज्याच्या आगमनाने सर्वकाही बदलून जाणार आहे तो (Monsoon) मान्सून आता अंदमानमध्ये दाखल झाला आहे. यंदा सुरवातीपासूनच मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. अखेर तो अंदाज आता खरा ठरला असून लो मै आया असेच म्हणत तो दाखल झाला आहे. यापुर्वी मान्सून 27 मे रोजी अंदमान-निकोबार येथे दाखल होऊन 1 जून रोजी (Kerala) केरळात धडकणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण यंदा मान्सूनच्या बाबतीत सर्वकाही वेळेपूर्वीच होत आहे. 16 मे रोजीच तो अंदमानमध्ये दाखल झाला असून पुढील आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. अनेक वर्षानंतर मान्सून वेळेत दाखल होत असून त्याचे शेती व्यवसयाच्या दृष्टीकोनातून अधिकचे फायदे आहेत.

केरळमध्ये ऑरेंज अलर्ट

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलम या सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तिरुवनंतपुरम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटेतून मिळणार दिलासा

देशभरात उष्णतेची लाट असतानाच मान्सूनचे आगमन होणार ही मोठी दिलासादायक बाब आहे. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. राज्यात सर्वाधिक फटका नागपूर विभागाला बसला असून उष्मघाताने सर्वाधिक मूत्यू याच विभागात झाले आहेत. मात्र, मान्सून आता बंगालच्या उपसागरातून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा परिणाम दिसून आला आहे. मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या आठवड्यात उत्तराखंड, मेघालय, आसाम आणि केरळमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

खरिपासाठी पोषक वातावरण

गतवर्षी परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून सर्वकाही वेळेवर होत आहे. पावासाचे आगमन वेळेवर होत असले तरी रब्बी हंगाम लांबल्याने अजूनही हंगामपूर्व मशागतीची कामे शिल्लक आहेत. पावासाला सुरवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. मान्सून ज्याप्रमाणे वेळेत दाखल होत आहे त्याचप्रमाणे वेळेत खरिपाच्या पेरण्या झाल्या तर उत्पादनातही भर पडणार आहे. खरिपाच्या दृष्टीने कृषी विभागही तत्पर असून शेतकऱ्यांनाच आता उर्वरीत कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.