AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर घणाघाती टीका केली.(Narendra Tomar Congress )

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय
नरेंद्र सिंह तोमर (फाईल फोटो)
| Updated on: Feb 05, 2021 | 3:26 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवरुन काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तोमर यांनी यावेळी भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचं सांगितलं. भारतात शेतकरी पाण्याचा वापर करुन शेती करतात. मात्र, काँग्रेसचं असा पक्ष आहे ज्याला फक्त रक्ताद्वारे शेती करायची आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र सिंह तोमर यांनी केली. (Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

नरेंद्रसिंह तोमर काय म्हणाले?

शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. विरोधी पक्ष कृषी कायद्यांना काळे कायदे म्हणत आहेत. त्यांनी कायद्यांमध्ये काय काळं आहे, हे सांगणार की नाही, असा सवाल केला. नवीन कृषी कायद्यांद्वारे शेतकरी त्यांचा शेतमाल देशातील कोणत्याही शहरात विकू शकतात. जर बाजारसमितीच्या बाहेर व्यापार झाला तर त्यावर कोणताही कर लावला जाणार नाही, असं तोमर म्हणाले.

राज्य सरकारचा कर रद्द

नरेंद्रसिंह तोमर यांनी नवीन कृषी कायद्यामुळे राज्य सरकारनं लावेलेल कर रद्द होतात. मात्र, राज्य सरकारचा कायदा कर द्यावा लागेल असं सांगतो. नरेंद्र सिंह तोमर यावेळी बोलताना पुढे म्हणाले की ज्यांच्या कायद्यात कर घेण्याची तरतूद आहे त्यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे. मात्र,इकडे उलटी गंगा वाहत आहे. पंजाब सरकारच्या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्यांन चूक केली तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र, केंद्राच्या कायद्यामध्ये ही तरतूद नाही.

काँग्रेसला रक्तानं शेती करायचीय

नरेंद्रसिंह तोमर यावेळी बोलताना म्हणाले की आम्ही शेतकऱ्याशी 12 वेळा चर्चा केली. त्यांच्या विरोधात काहीही बोललो नाही. तुम्हाला बदल पाहिजे असेल तर बदल सांगण्याची विंनती केली. मात्र, केंद्र सरकार कृषी कायद्यात बदल करत असेल तर कायदे चुकीचे आहेत, असं होत नाही. फक्त एका राज्याच्या शेतकऱ्यांना कृषी कायद्यांविरोधात भडकवलं जात आहे. शेतकऱ्यांना घाबरवलं जात आहे. शेती करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. मात्र, काँग्रेसला रक्ताची शेती करायची आहे, असा आरोप तोमर यांनी केला. शेती क्षेत्रात केंद्र सरकारनं काम केल आहे. आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवल्याचं तोमर म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,’ विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

शेतकरी आंदोलनाला रिहाना ते ग्रेटाच्या पाठिंब्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?

(Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.