AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये या वस्तू नेण्यास आहे सक्त मनाई, पकडल्यास होऊ शकतो मोठा दंड

भारतीय रेल्वेने ट्रेन आणि प्रवाशांची सुरक्षा पाहून अनेक वस्तूंसह प्रवास करण्यावर निर्बंध आणले आहेत. ट्रेनचा प्रवास करताना सोबत कोणत्या वस्तूंना टाळावेत ते पाहा...

ट्रेनमध्ये या वस्तू नेण्यास आहे सक्त मनाई, पकडल्यास होऊ शकतो मोठा दंड
Indian RailwayImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 16, 2023 | 3:07 PM
Share

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : भारतात रेल्वे हा प्रवासाचा सर्वात जलद आणि स्वस्त पर्याय असल्याने प्रवाशांची संख्या अधिक आहे. भारतीय रेल्वे ( Indian Railway ) दररोज 13,000 ट्रेन चालविते. रेल्वेने दररोज दोन कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे. रेल्वेतून प्रवासी अनेक वस्तूंसह प्रवास करीत असतात. तुम्ही जर ट्रेनने प्रवास करणार असाल तर मनाला वाटेल तशा वस्तू घेऊन गेल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ज्या वस्तूंमुळे प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण होईल अशा वस्तूंसह प्रवास करण्यास मनाई आहे. प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास केल्यास तुम्हाला केवळ दंडच नाही तर तुरुंगवास देखील होऊ शकतो.

भारतीय रेल्वेने ट्रेन आणि प्रवाशांची सुरक्षा पाहून अनेक वस्तूंसह प्रवास करण्यावर निर्बंध आणले आहेत. ट्रेनचा प्रवास करताना अनेक वस्तूंना प्रतिबंधित केले आहे. यात अशा वस्तू आहेत की ज्याच्यामुळे ट्रेनला आग लागु शकते, ट्रेन अस्वच्छ होऊ शकते, अन्य प्रवासांना असुविधा आणि ट्रेनचा अपघात होऊ शकतो अशा वस्तूंवर बंदी आहे. या वस्तूंसोबत कोचमधून प्रवास करण्यावरच नव्हे तर लगेजच्या डब्यातूनही नेण्यास बंदी आहे.

या वस्तूंसह प्रवासाला मनाई

रेल्वे प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणत्याही स्वरुपातील ज्वलनशील केमिकल, फटाके, एसिड, दुर्गंधीयुक्त पदार्थ, चमडे किंवा ओले चामडे, पाकिटातून नेता येणारे तेल, ग्रीस ज्याच्या गळतीने अन्य प्रवासी आणि त्यांच्या सामानला नुकसान होईल, रेल्वेच्या नियमानूसार किमान 20 किलोग्रॅमपर्यंत तूप तुम्ही घेऊन जाऊ शकता.परंतू तूपाच्या डब्यांना नीट पॅक करायला हवे.

तीन वर्षांचा कारावास 

रेल्वे प्रवासात प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करण्यास मनाई आहे. जर कोणी प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना सापडला तर त्याला रेल्वे कायदा कलम 164 अनूसार कारवाई होऊ शकते. या कलमांतर्गत प्रवाशावर 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षांचा कारावास वा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.